AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही भारतीय नागरिक आहात हे कसं सिद्ध कराल? पोलिसांचे नवे निकष काय?

तुमच्याकडे आधार आहे, पॅन आहे, रेशन कार्डही आहे... पण जर पोलीस म्हणाले की हे तुमच्या 'भारतीय नागरिकत्वाचा' पुरावा नाही, तर? कोणती कागदपत्रं ठरतायत निर्णायक आणि का, याबद्दलची ही महत्त्वाची माहिती तुमच्या फायद्याची ठरू शकते! चला, समजून घेऊया!

तुम्ही भारतीय नागरिक आहात हे कसं सिद्ध कराल? पोलिसांचे नवे निकष काय?
Indian citizen
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 15, 2025 | 11:55 PM
Share

सध्या जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. अवैध मार्गाने भारतात राहणाऱ्या व्यक्तींवर सरकार अधिक लक्ष केंद्रित करत आहे आणि अशा लोकांना शोधून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रं ग्राह्य धरली जातात, याबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, खासकरून दिल्लीमध्ये!

ओळखपत्रं अनेक, पण ‘नागरिकत्वाचा पुरावा’ कोणता?

आपल्याकडे ओळखीसाठी अनेक कागदपत्रं असतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. पण ही सगळीच कागदपत्रं तुम्हाला भारतीय नागरिक आहात हे सिद्ध करतात का? याबद्दल काही गैरसमज असू शकतात.

दिल्ली पोलिसांनी सध्या अवैध रहिवाशांना ओळखण्यासाठी जी मोहीम सुरू केली आहे, त्यामध्ये त्यांनी नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी स्वीकारल्या जाणाऱ्या कागदपत्रांबद्दल काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड ही कागदपत्रं तुमची ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी उपयोगी आहेत, पण ती थेट तुमचं ‘भारतीय नागरिकत्व’ सिद्ध करणारी निर्णायक कागदपत्रं म्हणून सध्याच्या मोहिमेत विचारात घेतली जात नाहीत.

मग नागरिकत्वाचा ‘अधिकृत’ पुरावा कोणता?

दिल्ली पोलिसांनी सध्याच्या मोहिमेत नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणून प्रामुख्याने दोनच कागदपत्रांना महत्त्व दिलं आहे:

एक म्हणजे भारतीय पासपोर्ट : तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट असणं हे तुम्ही भारतीय नागरिक असल्याचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि अधिकृत प्रमाणपत्र आहे. कारण पासपोर्ट मिळवताना तुमचं नागरिकत्व सखोलपणे तपासलेलं असतं.

दुसर म्हणजे मतदार ओळखपत्र: भारतीय निवडणूक आयोगाकडून मिळणारं मतदार ओळखपत्र हे देखील तुम्ही भारतीय नागरिक असल्याचं एक विश्वसनीय पुरावा मानलं जातं, कारण मतदानाचा हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच असतो.

याचा अर्थ असा नाही की आधार किंवा पॅन कार्डची किंमत कमी झाली आहे. ती इतर अनेक कामांसाठी आजही अत्यंत गरजेची आहेत. पण दिल्ली पोलिस सध्या अवैध रहिवाशांना ओळखण्यासाठी जेव्हा ‘नागरिकत्वाचा पुरावा’ मागेल, तेव्हा ते प्रामुख्याने पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र तपासेल.

जर पोलिसांना तुमच्याबद्दल संशय आला आणि त्यांनी तुम्हाला नागरिकत्वाचा पुरावा मागितला, पण तुमच्याकडे पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र नसेल किंवा तुम्ही ते दाखवू शकला नाही, तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात आणि नियमानुसार कारवाई किंवा अटकही केली जाऊ शकते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...