CJP Protest : …तरच जंतर-मंतर सोडू, सरकारला भेटण्याआधीच CJP कडून त्यांची भूमिका जाहीर
CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेचे दरवाजे उघडले आहे. CJP चे नेते आज दुपारी सरकारच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. न्यूट्रल वेन्यूवर त्यांची चर्चेची मागणी मान्य केली आहे.

“आज दुपारी 12.30 वाजता नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये चर्चा होईल. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलय, आम्हाला हवाबाजी नकोय. तुम्हाला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. धर्मेंद्र प्रधान यांना बर्खास्त करावचं लागेल. त्यापेक्षा खाली काही मंजूर नाही.धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ मगच आम्ही जंतर-मंतर सोडू” असं कॉकरोच जनता पार्टीचा नेते आशुतोष रांकाने म्हटलं आहे. “सोनम वांगचूक यांनी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनाला मोठं बनवलं. हा देश त्यांचा संघर्ष, त्याग कधीच विसरणार नाही. आता जबाबदारी आमची आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, तो पर्यंत इथून हलणार नाही” असं सीजेपीने म्हटलं आहे.
“सोनमजींनी 26 दिवस उपोषण केलं. आपल्याला त्यांचा त्याग वाया जाऊ द्यायचा नाहीय.दुसरी गोष्ट मी हे वारंवार सांगतोय की, दोन कारणांमुळे हे आंदोलन यशस्वी झालं आहे. एक म्हणजे या देशातील युवा रस्त्यावर उतरला आहे, हे या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे. आपण 6 जून रोजी सर्वप्रथम इथे आलो, तेव्हापासून शांततामय मार्गाने आपण आपलं मत मांडतोय. कुठलाही हिंसाचार, उद्धटपणा यांचं समर्थन केलेलं नाही. कायदा हातात घेतलेला नाही” असं आशुतोष राका म्हणाले. “राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत. हे गोडसेंना मानणारे लोक आहेत. आम्ही गांधी, आंबेडकरांना मानणारे लोक आहोत” असं आशुतोष राका म्हणाले.
दिल्ली पोलिसांचा महत्वाचा निर्णय
“आज आम्हाला अटक होऊ शकते. पण सरकारने अशी पावलं उचलू नयेत” असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे. आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत असं दीपकेने म्हटलय. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी अधिकाऱ्यापासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सोमवारी या मुद्यावर देशाच्या संसदेत चर्चा होऊ शकते. काल रात्री सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यांनी तीन अटींच्या आधारावर हे उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
