AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार

दीग्रामच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करुन मतदानावेळी मोठी गडबड केली जात असल्याचा आरोप केलाय.

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा राज्यपालांना फोन
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 01, 2021 | 3:21 PM
Share

नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. या टप्प्यात हायव्होल्टेज नंदीग्रामच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि नंदीग्रामच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना फोन करुन मतदानावेळी मोठी गडबड केली जात असल्याचा आरोप केलाय. तसंच याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. (Mamata Banerjee’s phone call to the Governor in Nandigram)

निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. आतापर्यंत 63 तक्रारी दाखल झाल्या आहेत पण एकाही तक्रारीवर कारवाई झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी नंदीग्राममध्ये समस्या निर्माण करण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शुभेंदु अधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामसह 30 जागा भाजप जिंकेल असा दावा केला आहे.

ममता बॅनर्जी बूथवर पोहोचताच गोंधळ

ममता बॅनर्जी जेव्हा बूथवर दाखल झाल्या तेव्हा भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला आणि एकमेकांवर आरोप लावले. भाजपचे लोक मतदान केंद्रांवर ताबा मिळवत मतदान प्रक्रिया प्रभावित करत आहेत, असा आरोप तृणमूलकडून करण्यात येतोय. ममता बॅनर्जी नंदीग्रामच्या ब्लॉक टू मधील मुस्लिम बहुल भागाचाही दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय.

TMC आणि BJP कार्यकर्त्यांचे एकमेकांवर आरोप

तृणमूल काँग्रेसचे पोलिस एजंट शेख सुफियानने आरोप केलाय की बूथवर सेंट्रल फोर्सेसच्या जवानांनी मतदारांना मारहाण केली. त्यांच्या एजेंटला बूथमध्ये प्रवेश करु दिला नाही. महिलांनाही आरोप केलाय की केंद्रीय बलाच्या जवानांनी त्यांना मारहाण केली. दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आपल्याला मतदान करु दिलं जात नसल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या :

West Bengal Elections 2021 : शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक, बंगालमध्ये राडेबाजी सुरुच

निवडणुकीत फटका बसेल या भीतीपोटीच मोदी आणि शाहांनी एका रात्रीत ‘तो’ निर्णय फिरवला

Mamata Banerjee’s phone call to the Governor in Nandigram

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?