AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना आजपासून मिळणार 3 हजार, अन्नपूर्णा योजनेला सुरूवात, पश्चिम बंगाल सरकारने..

पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली. ममता बनर्जी यांना जोरदार धक्का देत एकहाती सत्ता भाजपाने मिळवली. या निवडणुकीदरम्यान अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यामध्येच आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल.

महिलांना आजपासून मिळणार 3 हजार, अन्नपूर्णा योजनेला सुरूवात, पश्चिम बंगाल सरकारने..
Annapurna Yojana
| Updated on: Jun 03, 2026 | 9:37 AM
Share

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवली. निवडणुकीदरम्यान काही मोठ्या घोषणा भाजपाकडून करण्यात आल्या. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे राज्यातील महिलांना दर महिन्याला 3000 रूपये मिळतील, अशी घोषणा केली. आता भाजपाकडून दिलेले वचन पूर्ण केले जात आहे. आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी या योजनेची घोषणा केली. महिलांना दरमहिन्याला 3000 हजार रूपये मिळणार आहेत. बॅंकेच्या खात्यात महिलांचे हे पैसे थेट जातील. महिला घरगुती खर्च आणि इतर गोष्टींकरिता सरकारकडून ही मदत दिली जात आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीदरम्यान काही घोषणा केल्या होत्या. त्यात ही अन्नपूर्णा योजना होती. ममता बनर्जींच्या लक्ष्मी भंडार योजनेची जागा आता या योजनेने घेतली.

लक्ष्मी भंडार योजनेत महिलांना दर महिन्याला सरकारकडून 1500 रूपये दिली जात होती. आता अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना दुप्पट म्हणजेच 3000 रूपये सरकारकडून दिली जाणार आहेत. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले होते की, सरकारच्या लोक घरोघरी जाऊन या योजनेकरिता अर्ज भरण्याकरिता महिलांची मदत करत आहेत. 2 कोटी महिला या योजनेचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने महिला अर्ज करू शकतात. याकरिता विशेष टीम देखील तयार करण्यात आली. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता सरकारकडून काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्यात. या योजनेकरिता अर्ज फक्त महिलाच करू शकतात. यासोबतच महिला ही पश्चिम बंगालची रहिवासी असावी. यामध्ये 25 ते 60 वयोगटापर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात.

अर्ज करणाऱ्या महिला या आयकर भरणाऱ्या नसाव्यात. यासोबतच रिटायर्ड कर्मचाऱ्यांनाही या योजनेकरिता अर्ज भरता येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या महिलांना दरमहिन्याला 3000 हजार रूपये मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारची योजना सुरू केली. त्या योजनेमधून महिलांना दरमहिन्याला 1500 रूपये मिळतात. मात्र, आता या योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.