AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली. सर्व 210 साक्षीदार फितूर झाले असून, समाधानकारक पुरावे नाहीत, असे नमूद करुन कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण? सोहराबुद्दीन चकमक प्रकरण गुजरातमधील अहमादाबादेतील आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना कथित बनावट चकमकीत ठार करण्यात […]

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली. सर्व 210 साक्षीदार फितूर झाले असून, समाधानकारक पुरावे नाहीत, असे नमूद करुन कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे सोहराबुद्दीन चकमक प्रकरण?

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण गुजरातमधील अहमादाबादेतील आहे. सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांना कथित बनावट चकमकीत ठार करण्यात आलं होतं. अहमदाबादच्या विशाला सर्कलजवळच्या टोलनाक्यावर 26 नोव्हेंबर 2005 रोजी हा घटना घडली होती. इतकंच नाही तर या प्रकरणातील साक्षीदार  आणि सोहराबुद्दीनचा मित्र तुलसीराम प्रजापतीला वर्षभरानंतर 27 डिसेंबर 2006 रोजी, गुजरात-राजस्थान सीमेजवळ चापरी इथे कथित बनावट चकमकीत ठार केलं होतं. मात्र या सर्व हत्या गुजरात एटीएसने राजकीय दबावात केल्याचा आरोप होता. त्यामुळेच गुजरात सीआयडीकडून हा तपास 2012 मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर या खटल्याची निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधील हे प्रकरण महाराष्ट्रातील न्यायालयात वर्ग केलं होतं.

38 जणांविरोधात आरोपपत्र

सीबीआयने तपासानंतर 38 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये भाजपचे विद्यमान अध्यक्ष अमित शाह, गुजरात एटीएसचे तात्कालीन प्रमुख डी.जी. वंझारा यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश होता. मात्र खटल्यादरम्यान अमित शहा आणि वंझारा यांच्यासह एकूण 16 आरोपींना पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं.

उर्वरित 22 जणांचं भवितव्य

16 जणांना निर्दोष मुक्त केल्यानंतर, उरलेल्या 22 आरोपींविरोधात खटला सुरु होता, ज्याचा निकाल आज लागला. या 22 जणांमध्ये गुजरात आणि राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. सीबीआयने जवळपास 210 साक्षीदारांची साक्ष नोंदवली होती, मात्र यापूर्वी 92 जणांनी आपली साक्ष फिरवली होती.

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.