AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात तुर्कस्तान सारखा भूकंप येऊ शकतो का? आला तर काय होईल? पाहा तज्ज्ञ काय सांगतात

भारतात तुर्कस्तान सारखा भूकंप झाला तर काय परिस्थिती उद्भवू शकते. भारतात मोठ्या भूकंपाची शक्यता किती आहे. जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. भारत या संकटाचा सामना करण्यासाठी किती तयार आहे?

भारतात तुर्कस्तान सारखा भूकंप येऊ शकतो का? आला तर काय होईल? पाहा तज्ज्ञ काय सांगतात
| Updated on: Feb 14, 2023 | 6:23 PM
Share

मुंबई : तुर्कस्तान आणि सीरियात झालेल्या भूकंपामुळे 30,000 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या मोठ्या जीवितहानीमुळे बांधकाम व्यावसायिकांवर आता सरकारने कारवाई सुरु केली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अनेक इमारती कोसळल्या आणि अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. भूकंपाची २ दिवस आधीच शक्यता वर्तवणाऱ्या संशोधकांना भारतात आणि आजुबाजुच्या देशातही भूकंपाची शक्यता वर्तवली आहे. जर तुर्कस्तानसारखा भूकंप भारतात झाला तर काय होईल, असा प्रश्न अनेक भारतीय लोकांच्या मनात असेल. भूकंप आला तर त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का?

भारतात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत असतात. पण त्याची तीव्रता ही कमी असल्याने सुदैवाने कोणतीही हानी होत नाही. पण याचा फायदा असा होतो की, यामुळे एकदाच मोठा भूकंप होत नाही. तज्ज्ञ सांगतात की, ट्रिपल जंक्शन हा एक बिंदू आहे जिथे 3 टेक्टोनिक प्लेट सीमा एकत्र येतात. भूगर्भीय क्रियाकलापांमधील ही महत्त्वाची क्षेत्रे आहेत आणि भूकंप आणि ज्वालामुखीच्या क्रियाकलापांची महत्त्वाची ठिकाणे असू शकतात. या प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर दबाव निर्माण होऊ शकतो जो भूकंपाच्या स्वरूपात दिसू शकतो.

भारतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, देशाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्याकडे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या रूपात एक समर्पित आणि प्रशिक्षित सैन्य असल्याने मोठ्या प्रमाणावर भूकंपांना तोंड देण्यासाठी भारत सज्ज आहे. तज्ज्ञांच्या मते छोटे-छोटे धक्के दबाव कमी करण्यास आणि भारताला विनाशकारी भूकंपापासून वाचविण्यात मदत करत आहेत. पण भक्कम इमारती बनवण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास मोठ्या प्रमाणावर भूकंपाचा प्रभाव कमी होऊ शकतो. शिवाय हानी देखील कमी होऊ शकते.

तुर्कीमध्ये 2 ट्रिपल जंक्शन होते. या प्रदेशात भूकंपाचे छोटे धक्के आले नाहीत, त्यामुळे खूप दबाव जमा झाला. भारत हा भूकंपप्रवण प्रदेश आहे, पण आपले सुदैव आहे की आपल्याकडे दररोज अनेक छोटे-मोठे भूकंप होतात, त्यामुळे संचित ऊर्जा बाहेर पडते.

भूकंपामुळे होणारे नुकसान कमी कसे करावे

तज्ज्ञांच्या मते, भूकंपाच्या वेळी इमारतीचे होणारे नुकसान कमी करण्यात त्याची रेझोनंट वारंवारता महत्त्वाची भूमिका बजावू शकते. इमारतींमध्ये रेझोनंट फ्रिक्वेन्सी नावाच्या कंपनांची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असते जी त्यांच्या वस्तुमान, कडकपणा आणि आकाराद्वारे निर्धारित केली जाते. भूकंपाच्या आधारावर, जमिनीवरील क्रियाकलाप या नैसर्गिक फ्रिक्वेन्सी वाढवू शकतात, ज्यामुळे इमारत त्याच्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीमध्ये कंप पावते. भूविज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील ५९ टक्के जमीन भूकंपासाठी असुरक्षित आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.