AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑगस्ट या तारखेलाच का मिळाले भारताला स्वातंत्र? भविष्यवाणी, ज्योतिषशास्त्र की आणखी काही कारण

independence day: भारताला स्वातंत्र देण्यासाठी मी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा विचार करत होतो. परंतु 15 ऑगस्ट ही तारीख अचानक माझ्या डोक्यात आली. कारण दुसऱ्या महायुद्धात या दिवशी जापानने आत्मसमर्पण केले होते. त्याला दोन वर्ष पूर्ण झाले होते.

15 ऑगस्ट या तारखेलाच का मिळाले भारताला स्वातंत्र? भविष्यवाणी, ज्योतिषशास्त्र की आणखी काही कारण
independence day
| Updated on: Aug 15, 2024 | 2:00 PM
Share

भारताला स्वातंत्र 15 ऑगस्ट या तारखेला मिळाले. संपूर्ण जग झोपलेले असताना मध्यरात्री भारत स्वातंत्र झाला. स्वातंत्र्याची ही तारीख आणि मध्यरात्रीची वेळ निवडण्यामागे कारण काय आहे? त्यासाठी भविष्यवाणी किंवा ज्योतिषशास्त्राचा काही संदर्भ आहे का? भारतातील नेत्यांची ही मागणी होती का? पाहू या…

ब्रिटनमधून क्लेमेंट एटली यांचा घोषणा

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या. त्यात लेबर पार्टी सत्तेत आली. पंतप्रधानपदी क्लेमेंट एटली यांची निवड झाली. त्यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र करण्याची घोषणा केली. त्यामुळे व्हायसराय लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे सोळा महिने शिल्लक होते. परंतु त्यांनी 3 जून 1947 रोजीच 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र देण्याची घोषणा केली. त्यांच्याकडे 30 जून 1948 पर्यंतची वेळ असताना 15 ऑगस्ट तारीख त्यांनी का निश्चित केली? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पत्रकार कुलदीप नैय्यर यांनी लंडनमध्ये 1971 रोजी माउंटबेटन यांची भेट घेतली. माउंटबॅटन यांनी सांगितले की, भारतामधील परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आपले काम पूर्ण करायचे होते.

ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा विचार

लेखक लॅरी कॉलिन्स आणि टोमिनिक लॅपियर यांनी त्यांच्या ‘फ्रीडम एट मिडनाइटम’ध्ये पुस्तकात लॉर्ड माऊंटबॅटन यांचा संदर्भ देत म्हटले आहे की, भारताला स्वातंत्र देण्यासाठी मी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याचा विचार करत होतो. परंतु 15 ऑगस्ट ही तारीख अचानक माझ्या डोक्यात आली. कारण दुसऱ्या महायुद्धात या दिवशी जापानने आत्मसमर्पण केले होते. त्याला दोन वर्ष पूर्ण झाले होते.

ज्योतिषीकडून या तारखेला विरोध

15 ऑगस्ट ही तारीख जाहीर होताच पंडित आणि ज्योतिषीही आपली पंचांग उघडले. “फ्रीडम ॲट मिडनाईट” मध्ये, डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी लिहिले, “काशी आणि दक्षिणेतील ज्योतिषींनी म्हटले की 15 ऑगस्ट हा दिवस शुभ नाही. त्यामुळे भारताला नरक यातना सहन कराव्या लागतील. यामुळे देशाने आणखी एक दिवस ब्रिटिश राजवट सहन करावी.

मग ज्योतिषींना उपाय विचारला. त्यानंतर त्यांनी अभिजित मुहूर्त सांगितला. हा मुहूर्त 14 ऑगस्टच्या रात्री 11.51 ते 12.39 होता. त्यामुळे तारीख न बदलता मध्यरात्री भारत स्वातंत्र झाला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या ऐतिहासिक भाषणात म्हटले होते की, आपला भारत दीर्घ झोपेनंतर आणि संघर्षानंतर पुन्हा जागृत झाला आहे. आपण नव्याने इतिहास लिहित आहोत. आता आपण घडवलेला इतिहास इतरांना लिहिण्यास भाग पाडेल.

हे ही वाचा…

पेट्रोलपासून दुधापर्यंत, बटाट्यापासून सोन्यापर्यंत गेल्या 77 वर्षांत कसा बदलला भारत

ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद
नाचरेवाडीत पावणे चार तासांपासून मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद.
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं.
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान
येत्या काळात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार;रोहित पवारांचं सूचक विधान.
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!
आमदार विलास भुमरेंनी मतदानावेळी ईव्हीएम जवळ मुलालाही नेलं!.
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!
Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडेंची वर्णी!.
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही
नदीतूनच प्रवास... मतदार म्हणतात, रस्ता नाही, तर मत नाही.