AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ एका कारणामुळे एअर स्ट्राईक नेहमी रात्रीच होतात; तुम्हाला माहितीये का?

असा प्रश्न निर्माण होतो की, एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच का होतात? याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेलच चला तर मग जाणून घेऊयात.

'या' एका कारणामुळे एअर स्ट्राईक नेहमी रात्रीच होतात; तुम्हाला माहितीये का?
| Updated on: May 09, 2025 | 4:35 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 25 भारतीय तर 1 नेपाळी व्यक्तीचा समावेश होता. दरम्यान भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून या हल्ल्याचा बदला घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्री भारतानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. भारतानं केलेल्या या हल्ल्यामध्ये एकूण 9 दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यामध्ये पाक व्याप्त काश्मीरमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवादी ठिकाणांचा समावेश आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे.

पाकिस्तानने त्यानंतर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं, भारतानं पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत, गुरुवारी रात्रीच्या वेळी पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या तीन राज्यांमध्ये जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र भारताच्या डिफेंस यंत्रणेनं हा हल्ला यशस्विरित्या परतून लावला आहे, पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर अपटला आहे. मात्र आता असा प्रश्न निर्माण होतो की, एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच का होतात? याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेलच चला तर मग जाणून घेऊयात.

एअर स्ट्राईक रात्रीच केले जातात त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे रात्रीच्या वेळी शत्रू हवा तेवढा सतर्क नसतो, त्यामुळे लक्ष्यभेद करायला अनुकूल परिस्थिती असते. तसेच रात्री दृष्यमानता कमी असते, त्यामुळे शत्रूच्या डिफेंस यंत्रणेला हल्ला नेमका कुठून सुरू आहे, याचा अचूक अंदाज लवकर येत नाही, तसेच रात्रीच्या वेळी एअर ट्राफिक देखील खूप कमी असते, त्यामुळे कोणताही अडथळा न येता असे हल्ले करता येतात, त्यामुळे एअर स्ट्राईक हे नेहमी रात्रीच्या वेळीच होतात. रात्री जेव्हा एअर स्ट्राईक होतो, तेव्हा अधिक अचूक लक्ष्यभेद करता येतो. रात्रीच्या वेळी शत्रू  गाफील असतात, याचा फायदा होतो.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.