AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओदिशा रेल्वे अपघातानंतर शाळेत जायला का घाबरत आहेत मुलं, काय कारण आहे ?

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की शाळेच्या काही मोठ्या मुलांनी आणि एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी बचाव कार्यात देखील सहभाग घेतला होता.

ओदिशा रेल्वे अपघातानंतर शाळेत जायला का घाबरत आहेत मुलं, काय कारण आहे ?
Odisha-accidentImage Credit source: socialmedia
| Updated on: Jun 08, 2023 | 9:16 PM
Share

बालासोर : ओदिशाच्या बहनगा उच्च विद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या शाळेत जाण्यासाठी घाबरत आहेत. या शाळेत अपघातानंतर सुरुवातीला रेल्वे अपघातातील मृतदेहांना ठेवण्यात आले होते. शुक्रवार दि. 2 जूनच्या सायंकाळी ओदिशा ( Odisha Railway Accident ) येथील बालासोर जिल्ह्यातील ( Balasore Train Accident )  रेल्वेच्या झालेल्या भीषण अपघातात 275 प्रवासी ठार झाले तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर अनेक मृतदेहांची अद्याप ओळखही पटलेली नाही.

ओदिशाचा रेल्वे अपघाताची घटना घडली तेव्हा लागलीच 65 वर्षीय जुन्या असलेल्या या शाळेत मृतदेहांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची भीती वाटत आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीने राज्य सरकारला ही इमारत जुनी झाली असल्याने तिला पाडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. बहनगा उच्च विद्यालयाचे प्रिन्सिपलनी मान्य केले की विद्यार्थी घाबरले आहेत. त्यामुळे शाळेत आम्ही पुजा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शाळेच्या पुनर्विकासाची मागणी 

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की शाळेच्या काही मोठ्या मुलांनी आणि एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी बचाव कार्यात देखील सहभाग घेतला होता. शाळा आणि लोकशिक्षण विभागाच्या निर्देशानंतर शाळेचा दौरा करणारे बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितले की आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी, प्रिन्सिपल, अन्य कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. ते शाळेच्या जुन्या इमारतीला पाडून तिचा पुनर्विकास करू इच्छीत आहे. म्हणजे मुलांना त्यांच्या वर्गात या कसलीही भिती वाटणार नाही.

मुलांनी टीव्हीवर पाहिले 

शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्याने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की अपघातानंतर स्कूलमध्ये मृतदेहांना ठेवल्याचे विद्यार्थ्यांनी टीव्हीवर पाहीले. त्यामुळे मुले स्वाभाविकपणे घाबरली आहेत. आणि 16 जूनला शाळा सुरु होणार आहे. पण मुले आणि पालक शाळेत येण्यास चाचरत आहेत. वास्तविक अपघातानंतर लागलीच शाळेत ठेवलेले मृतदेह लागलीच हलविले. नंतर शाळेचे वर्ग आणि परिसर साफ करण्यात आला होता. परंतू विद्यार्थी आणि त्यांचे पालक घाबरलेले आहेत.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय