AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा

सोनम वांगचूक यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं आहे, उपोषण का सोडलं? याबाबत त्यांनी आता मोठा खुलासा केला आहे. त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा
sonam wangchukImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 5:00 PM
Share

नीट पेपर फुटीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या एक महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जतंर मतंरवर आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यांनी तब्बल 21 दिवस जंतर मंतरवर आमरण उपोष केलं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान 23 जुलै रोजी उपोषणाच्या 26 व्या दिवशी वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सोनम वांगचूक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, याच रुग्णालयात मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, दरम्यान सोनम वांगचूक यांनी घेतलेल्या या भूमिकेवरून काही जणांकडून त्यांच्यावर टीका होत आहे, यावर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचूक यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सोनम वांगचूक

तुम्ही मला आता विचाराल की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं? पहिली गोष्ट मला यावर सरकार कोणतंही आश्वासन देऊ शकलेलं नाहीये, मात्र संसदेमध्ये यावर चर्चा होईल, माझ्याकडे दोनच मार्ग होते, एक तर उपोषण सोडून द्यावं किंवा उपोषण पुढेही सुरूच ठेवावं. परंतु मला हजारो लोकांनी सांगितलं की तुमचा जीव महत्त्वाचा आहे. तुम्हाला पुढच्या काळात देखील संघर्ष करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला जिवंत राहावं लागेल. मी हे देखील मान्य करणार नाही की या आंदोलनातून आमच्या हाती काहीच लागलं नाही. माझं डोकं वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला किंवा विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही, तर त्यांचं नुकसान होईल. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असता तर सरकारचं नुकसान टळलं असतं, असं यावेळी वांगचूक यांनी म्हटलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांवर कोणतीही केस झाली नाही पाहिजे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं, आम्ही लडाखमध्ये पाहिलं आहे, एकदा एफआयआर झाली की आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे सरकारने मला असं आश्वासन दिलं आहे की, या मुलांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, तसेच नीट पेपर प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच