AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा

सोनम वांगचूक यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं आहे, उपोषण का सोडलं? याबाबत त्यांनी आता मोठा खुलासा केला आहे. त्यांनी या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोनम वांगचूक यांनी उपोषण का सोडलं? पहिल्यांदाच खरं कारण समोर, केला सर्वात मोठा खुलासा
sonam wangchukImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 5:00 PM
Share

नीट पेपर फुटीवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या एक महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जतंर मतंरवर आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यांनी तब्बल 21 दिवस जंतर मंतरवर आमरण उपोष केलं, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान 23 जुलै रोजी उपोषणाच्या 26 व्या दिवशी वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सोनम वांगचूक यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, याच रुग्णालयात मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे घेतलं, दरम्यान सोनम वांगचूक यांनी घेतलेल्या या भूमिकेवरून काही जणांकडून त्यांच्यावर टीका होत आहे, यावर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचूक यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सोनम वांगचूक

तुम्ही मला आता विचाराल की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं? पहिली गोष्ट मला यावर सरकार कोणतंही आश्वासन देऊ शकलेलं नाहीये, मात्र संसदेमध्ये यावर चर्चा होईल, माझ्याकडे दोनच मार्ग होते, एक तर उपोषण सोडून द्यावं किंवा उपोषण पुढेही सुरूच ठेवावं. परंतु मला हजारो लोकांनी सांगितलं की तुमचा जीव महत्त्वाचा आहे. तुम्हाला पुढच्या काळात देखील संघर्ष करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला जिवंत राहावं लागेल. मी हे देखील मान्य करणार नाही की या आंदोलनातून आमच्या हाती काहीच लागलं नाही. माझं डोकं वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला किंवा विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही, तर त्यांचं नुकसान होईल. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असता तर सरकारचं नुकसान टळलं असतं, असं यावेळी वांगचूक यांनी म्हटलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांवर कोणतीही केस झाली नाही पाहिजे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं, आम्ही लडाखमध्ये पाहिलं आहे, एकदा एफआयआर झाली की आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळे सरकारने मला असं आश्वासन दिलं आहे की, या मुलांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, तसेच नीट पेपर प्रकरणात ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असं सोनम वांगचूक यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल