AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon: भारतासाठी मान्सून का आहे सर्वाधिक महत्वाचा? यंदाचा मुहूर्त ठरला..!

मान्सूनचा पाऊस तर देशाच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्याचे आगमनही अनेक बाबींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आगमनाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून यंदा सरासरीपेक्षा अधिक तर बरसणार आहेच पण विशेष म्हणजे तो वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 1 जून हीच मान्सून आगमानाची खरी तारिख आहे.

Monsoon: भारतासाठी मान्सून का आहे सर्वाधिक महत्वाचा? यंदाचा मुहूर्त ठरला..!
मान्सूनला भारतामध्येच नव्हे तर अशिया खंडात अनन्यसाधारण महत्व आहे.
| Updated on: May 14, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई : अद्याप (Monsoon) मान्सूनला सुरवात झालेली नाही तर हे केवळ अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, मान्सूनच्या अंदाजबाबतही मोठी उत्सुकता प्रत्येक भारतीयांच्याच नव्हे तर अशिया खंडातील बहुतांश देशातील नागरिकांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ अंदाज वर्तवले जात आहेत तर या अंदाजावरुन समाधान व्यक्त होते आहे. त्याच्या येण्यानं साऱ्यांच कसं प्रफुल्लित होते, असे काय आहे या मान्सूनमध्ये असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण जो घटक (Indian economy) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो कणाच या मान्सूनवर आधारित आहे. भारतामधील 70 टक्के पाऊस हा मान्सूनवरच अवलंबून आहे. त्यानुसार येथील (Agribusiness) शेती व्यवसायातील सर्व पिके याच पावसावर अवलंबू आहेत. भारतामधील 17 टक्के जेडीपी हा शेतीवर अवलंबून आहे निम्म्याहून अधिक कामगार शक्ती या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मान्सूनबाबत निराशा करणारी एक बातमी देखील या क्षेत्रातील लोक आणि बाजारावर निराशेचे सावट आणते. केवळ शेतीशी निगडीतच नव्हे तर इतर उद्योगधंद्याना उभारी देण्यासाठीही मान्सून हा महत्वाचा घटक आहे.

यंदा केव्हाचा मुहूर्त ?

मान्सूनचा पाऊस तर देशाच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्याचे आगमनही अनेक बाबींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आगमनाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून यंदा सरासरीपेक्षा अधिक तर बरसणार आहेच पण विशेष म्हणजे तो वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 1 जून हीच मान्सून आगमानाची खरी तारिख आहे. गेल्या अनेक वर्षानंतर मान्सून हे मुहूर्त साधणार तर आहेच पण सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा तो अधिक बरसणार आहे. हीच बाब शेती व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. दरवर्षी दणक्यात आगमन आणि त्यानंतर उघडीप दिली तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे ओढावते त्यामुळे मान्सूनच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे.

मान्सून सामान्य म्हणजे नेमके काय?

मान्सून कालावधीत जर पाऊस दिर्घकालीन सरासरीच्या (LPA) तुलनेत 96 ते 104 टक्के बरसला तर त्यास सामान्य मान्सून असं म्हणतात. एलपीए म्हणजे देशभरातील पावसाचा 1961 ते 2010 दरम्यानचा सरासरी डेटा असून त्यानुसार या कालावधीतील पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर आहे.मागील डाटा नुसार मान्सून पावसाची सरासरी ही ठरवली जाते. यंदा देखील स्कायमेटने देशातील बहुतांश भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

यामुळे मान्सूनला आहे महत्व..

भूप्रदेशाच्या प्रकारानुसार वार्षिक मोसमी पाऊस म्हणजे मान्सून हा भारतीय उपखंडातील जलचक्र, पीक चक्र, पीक पद्धती, मासेमारीचे चक्र, गुरे चरण्याचे मार्ग, व्यापारी मार्ग इत्यादींची निश्चिती करतो. याचाच दुसरा अर्थ असा की, या उपखंडातील सारे जीवनमान या मान्सूनवर अवलंबून आहे. म्हणूनच इथली अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थाही मान्सूनच्या गणिताशी जोडलेली आहे. आगमन दणक्यात झाले आणि पुन्हा उघडीप दिली तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावते. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर देशाच्या एकूण उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळेच मान्सूनला एक वेगळेच महत्व आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.