Monsoon: भारतासाठी मान्सून का आहे सर्वाधिक महत्वाचा? यंदाचा मुहूर्त ठरला..!

मान्सूनचा पाऊस तर देशाच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्याचे आगमनही अनेक बाबींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आगमनाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून यंदा सरासरीपेक्षा अधिक तर बरसणार आहेच पण विशेष म्हणजे तो वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 1 जून हीच मान्सून आगमानाची खरी तारिख आहे.

Monsoon: भारतासाठी मान्सून का आहे सर्वाधिक महत्वाचा? यंदाचा मुहूर्त ठरला..!
मान्सूनला भारतामध्येच नव्हे तर अशिया खंडात अनन्यसाधारण महत्व आहे.
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 6:30 AM

मुंबई : अद्याप (Monsoon) मान्सूनला सुरवात झालेली नाही तर हे केवळ अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, मान्सूनच्या अंदाजबाबतही मोठी उत्सुकता प्रत्येक भारतीयांच्याच नव्हे तर अशिया खंडातील बहुतांश देशातील नागरिकांच्या मनात आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ अंदाज वर्तवले जात आहेत तर या अंदाजावरुन समाधान व्यक्त होते आहे. त्याच्या येण्यानं साऱ्यांच कसं प्रफुल्लित होते, असे काय आहे या मान्सूनमध्ये असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण जो घटक (Indian economy) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो कणाच या मान्सूनवर आधारित आहे. भारतामधील 70 टक्के पाऊस हा मान्सूनवरच अवलंबून आहे. त्यानुसार येथील (Agribusiness) शेती व्यवसायातील सर्व पिके याच पावसावर अवलंबू आहेत. भारतामधील 17 टक्के जेडीपी हा शेतीवर अवलंबून आहे निम्म्याहून अधिक कामगार शक्ती या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मान्सूनबाबत निराशा करणारी एक बातमी देखील या क्षेत्रातील लोक आणि बाजारावर निराशेचे सावट आणते. केवळ शेतीशी निगडीतच नव्हे तर इतर उद्योगधंद्याना उभारी देण्यासाठीही मान्सून हा महत्वाचा घटक आहे.

यंदा केव्हाचा मुहूर्त ?

मान्सूनचा पाऊस तर देशाच्या दृष्टीने महत्वाचा तर आहेच पण त्याचे आगमनही अनेक बाबींसाठी महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आगमनाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्कायमेट या संस्थेने मान्सून यंदा सरासरीपेक्षा अधिक तर बरसणार आहेच पण विशेष म्हणजे तो वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 1 जून हीच मान्सून आगमानाची खरी तारिख आहे. गेल्या अनेक वर्षानंतर मान्सून हे मुहूर्त साधणार तर आहेच पण सलग चौथ्या वर्षी सरासरीपेक्षा तो अधिक बरसणार आहे. हीच बाब शेती व्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. दरवर्षी दणक्यात आगमन आणि त्यानंतर उघडीप दिली तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटे ओढावते त्यामुळे मान्सूनच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे.

मान्सून सामान्य म्हणजे नेमके काय?

मान्सून कालावधीत जर पाऊस दिर्घकालीन सरासरीच्या (LPA) तुलनेत 96 ते 104 टक्के बरसला तर त्यास सामान्य मान्सून असं म्हणतात. एलपीए म्हणजे देशभरातील पावसाचा 1961 ते 2010 दरम्यानचा सरासरी डेटा असून त्यानुसार या कालावधीतील पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर आहे.मागील डाटा नुसार मान्सून पावसाची सरासरी ही ठरवली जाते. यंदा देखील स्कायमेटने देशातील बहुतांश भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

यामुळे मान्सूनला आहे महत्व..

भूप्रदेशाच्या प्रकारानुसार वार्षिक मोसमी पाऊस म्हणजे मान्सून हा भारतीय उपखंडातील जलचक्र, पीक चक्र, पीक पद्धती, मासेमारीचे चक्र, गुरे चरण्याचे मार्ग, व्यापारी मार्ग इत्यादींची निश्चिती करतो. याचाच दुसरा अर्थ असा की, या उपखंडातील सारे जीवनमान या मान्सूनवर अवलंबून आहे. म्हणूनच इथली अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थाही मान्सूनच्या गणिताशी जोडलेली आहे. आगमन दणक्यात झाले आणि पुन्हा उघडीप दिली तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावते. यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर देशाच्या एकूण उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळेच मान्सूनला एक वेगळेच महत्व आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.