AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा पती तलावात बुडाला’, राजा रघुवंशीपेक्षाही भयानक हत्याकांड, कारण ऐकून पोलिसांचा डोक्याला हात

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केली आहे, सत्य समोर येताच पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

'माझा पती तलावात बुडाला', राजा रघुवंशीपेक्षाही भयानक हत्याकांड, कारण ऐकून पोलिसांचा डोक्याला हात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2025 | 7:25 PM
Share

इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांड ताजं असतानाच आता मध्य प्रदेशमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. जबलपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. जबलपूरमधील अधारताल पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या क्षेत्रात पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, आपला पती तलावात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा देखील या महिलेनं केला. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा पर्दाफाश झाला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गणेशी बाई असं या आरोपी महिलेचं नाव आहे. तर अरविंद असं हत्या झालेल्या तिच्या पतीचं नाव आहे. ती जबलपूरमध्ये राहाते. तिने आधी आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं. त्यानंतर आपला पती बुडाल्याचं तिने सांगितलं. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा खोटेपना समोर आला आहे.

जेव्हा या महिलेच्या पतीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला, त्यामध्ये असं दिसून आलं की त्याचा मृत्यू हा तलावात बुडाल्यामुळे नाही तर कोणीतरी त्याच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तुने प्रहार केल्यामुळे झाला आहे. पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला, पोलिसांनी यासंदर्भात मृत व्यक्तीच्या पत्नीकडे कसून चौकशी केली, चौकशीमध्ये तीने हत्येची कबुली दिली आहे.

या हत्येबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गणेशी बाईने हत्येची कबुली दिली आहे. पती आणि तिच्यामध्ये सतत वाद होत होता. रोजच्या वादाला कंटाळून तिने आपल्या पतीच्या डोक्यात दगड टाकला त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले. त्यानंतर तिने आपल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टमुळे सत्य बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घरगुती भांडणांमुळे हत्या 

गणेशी बाई आणि तिचा पती अरविंद यांच्यामध्ये सतत भांडणं व्हायचे, रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर तिने आपल्या पतीलाच संपवलं. तिने आधी पतीच्या डोक्यात दगड टाकला, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.