AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझा पती तलावात बुडाला’, राजा रघुवंशीपेक्षाही भयानक हत्याकांड, कारण ऐकून पोलिसांचा डोक्याला हात

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केली आहे, सत्य समोर येताच पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.

'माझा पती तलावात बुडाला', राजा रघुवंशीपेक्षाही भयानक हत्याकांड, कारण ऐकून पोलिसांचा डोक्याला हात
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Jun 21, 2025 | 7:25 PM
Share

इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांड ताजं असतानाच आता मध्य प्रदेशमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. जबलपूरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. जबलपूरमधील अधारताल पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या क्षेत्रात पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, आपला पती तलावात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा देखील या महिलेनं केला. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा पर्दाफाश झाला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गणेशी बाई असं या आरोपी महिलेचं नाव आहे. तर अरविंद असं हत्या झालेल्या तिच्या पतीचं नाव आहे. ती जबलपूरमध्ये राहाते. तिने आधी आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिलं. त्यानंतर आपला पती बुडाल्याचं तिने सांगितलं. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच या महिलेचा खोटेपना समोर आला आहे.

जेव्हा या महिलेच्या पतीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला, त्यामध्ये असं दिसून आलं की त्याचा मृत्यू हा तलावात बुडाल्यामुळे नाही तर कोणीतरी त्याच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तुने प्रहार केल्यामुळे झाला आहे. पोलिसांना त्याच्या पत्नीवर संशय आला, पोलिसांनी यासंदर्भात मृत व्यक्तीच्या पत्नीकडे कसून चौकशी केली, चौकशीमध्ये तीने हत्येची कबुली दिली आहे.

या हत्येबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गणेशी बाईने हत्येची कबुली दिली आहे. पती आणि तिच्यामध्ये सतत वाद होत होता. रोजच्या वादाला कंटाळून तिने आपल्या पतीच्या डोक्यात दगड टाकला त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले. त्यानंतर तिने आपल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र पोस्ट मार्टम रिपोर्टमुळे सत्य बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घरगुती भांडणांमुळे हत्या 

गणेशी बाई आणि तिचा पती अरविंद यांच्यामध्ये सतत भांडणं व्हायचे, रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर तिने आपल्या पतीलाच संपवलं. तिने आधी पतीच्या डोक्यात दगड टाकला, त्यानंतर त्याला तलावात फेकून दिले.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.