IPL POTM : आयपीएल इतिहासातील 9 अपयशी खेळाडू, विराटचाही समावेश, आणखी कोण कोण?
IPL : क्रिकेट चाहत्यांना लवकरच आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएलच्या 19 मोसमातील सामन्याचा थरार अनुभवयाला मिळणआर आहे. या स्पर्धेतील 9 अपयशी खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. एका ट्रॉफीसाठी 10 संघांमध्ये चुरस असणार आहे. सर्व संघ या 19 व्या तयारीला लागले आहेत. या निमित्ताने स्पर्धेत कोणत्याही एका संघाविरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार न जिंकता सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)

आर अश्विन याने मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक 37 सामने खेळले आहेत.अश्विनला पलटण विरुद्ध 37 सामने खेळल्यानंतर एकदाही सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही. तर दिनेश कार्तिक याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 33 सामने खेळले आहेत. मात्र कार्तिकला या 33 पैकी एकाही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकता आलेला नाही. (Photo Credit: PTI)

रॉबिन उथप्पा याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सर्वाधिक 28 सामने खेळले आहेत. उथप्पाला या 28 पैकी एकाही सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकता आला नाही. तर यूसुफ पठाण याने पंजाब विरुद्ध सर्वाधिक 24 सामने खेळले. मात्र युसूफलाही हा पुरस्कार जिंकण्यासारखी कामगिरी करता आली नाही. (Photo Credit: PTI)

दिनेश कार्तिक याला आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 28 सामने खेळूनही एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी होता आलं नाहीय. तर विराट कोहली याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 33 सामने खेळलेत. मात्र विराटलाही राजस्थान विरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकता आला नाही. (Photo Credit: PTI)

ऑलराउंडर सुनील नारायण याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 27 सामने खेळले आहेत. तर भुवनेश्वर कुमार याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सर्वाधिक 30 सामने खेळलेत. मात्र दोघांनाही या संघाविरुद्ध मॅचविनिंग खेळी साकारुन सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही. (Photo Credit: PTI)

ऑलराउंडर हार्दिक पंड्या एलएसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार न जिंकता सर्वाधिक 8 सामने खेळला आहे. तर ट्रेन्ट बोल्ट याला गुजरात टायटन्स विरुद्ध 8 सामने खेळूनही सामनावीर होता आलं नाही. (Photo Credit: PTI)