सगळ्यात खराब किसिंग सीन; सैफ आणि राणीचा रोमॅन्स पाहून दिग्दर्शकही चिडली, नेमकं काय घडलं?
2004मध्ये एक सुपरहिट सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक कुणाल कोहली यांच्यात खटके उडाले होते. मात्र, एका 'किसिंग सीन'च्या शूटिंगवेळी तर विचित्रच काही तरी सुरु होते.

बॉलिवूड असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, रुपेरी पडद्यामागील कथा जेव्हा समोर येतात तेव्हा सर्वजणच चकीत होतात. असाच बॉलिवूडमधील एक हिट सिनेमा आहे ज्यातील किसिंग सीन हा अतिशय खराब असल्याचे स्वत: दिग्दर्शकाने सांगितले होते. आता हा सिनेमा कोणता आहे? जाणून घ्या

आम्ही ज्या चित्रपटाविषयी बोलत आहोत तो म्हणजे 'हम तुम.' या चित्रपटाची प्रेमकथा लोकांना खूप आवडली होती. सैफ अली खान आणि राणी मुखर्जीच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा सेटवरचे वातावरण पूर्णपणे वेगळे होते. चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते यांच्यात आपापसात बोलणेही बंद होते. चित्रपट तयार होण्यापूर्वीच मोडकळीस आला होता.

दिग्दर्शक कुणाल कोहली यांचा हा चित्रपट २००४ मध्ये आला होता. संपूर्ण कथा करण आणि रिया या दोघांच्याच भोवती फिरते, जे आधी भांडतात आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. चित्रपटातील अप्रतिम विनोद आणि रोमान्स आज २२ वर्षांनंतरही लोकांना तितकाच आवडतो. पण कॅमेऱ्यामागचे वास्तव काही वेगळेच होते, जे प्रेक्षकांना कधीच कळले नाही.

दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शूटिंगच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणाचेही एकमेकांशी पटत नव्हते. सैफ अली खान पूर्णपणे एकटा पडला होता, तर दुसरीकडे राणी आणि दिग्दर्शकाची आपली वेगळी टीम होती. कुणालने स्पष्टपणे सांगितले की ऑफ-स्क्रीन राणी आणि सैफ यांचे अजिबात पटत नव्हते. एवढेच नाही तर कुणाल आणि सैफ यांच्यातही बरेच खटके उडत होते, फक्त राणी आणि कुणाल एकमेकांशी नीट बोलायचे.

हा कटूपणा दूर करण्यासाठी ॲमस्टरडॅम शेड्युलदरम्यान कुणालने सैफला बाजूला नेऊन स्पष्ट शब्दांत समजावले. ते म्हणाले, 'भाऊ, हा चित्रपट तुझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर हा फ्लॉप झाला, तर तुला कधीही सोलो हिरोचा (मुख्य अभिनेत्याचा) रोल मिळणार नाही. आयुष्यभर शाहरुख खानच्या मागे सेकंड लीडच करत राहशील - जसे 'कल हो ना हो' मध्ये केले होते.' ही कडू गोष्ट सैफच्या मनाला लागली.

दिग्दर्शकाचे सैफसोबत बोलणे झाल्यानंतर सेटवरील वातावरण अचानक बदलले आणि सगळे मिळून काम करू लागले. कुणालने प्रामाणिकपणे कबूल केले की या कटूपणामागे कोणतेही मोठे कारण किंवा भांडण नव्हते. खरं तर, ते सर्व त्यावेळी तरुण होते, हट्टी होते आणि प्रत्येकाचा आपला वेगळा ॲटिट्यूड होता. मजेची गोष्ट म्हणजे त्यावेळी फक्त राणीकडे हिट चित्रपट होते, तर सैफ आणि कुणालच्या खात्यात अपयश होते, तरीही त्यांचा रुबाब आकाशाला भिडलेला होता.

चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये एक रोमँटिक सीन होता जिथे राणी मुखर्जीला सैफला किस करायचे होते. ही त्या काळात खूप मोठी गोष्ट होती. राणी यासाठी अजिबात तयार नव्हती आणि खूप संकोच करत होती. रात्रभर शूटिंग चालल्यानंतर राणी शेवटी फक्त एक टेक देण्यासाठी तयार झाली. पण जो टेक कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला, त्याने निर्माता आदित्य चोप्रा यांनाही हैराण केले.

कुणाल कोहली यांनी एडिटिंग टेबलवर तो सीन पाहिला, तेव्हा राणी प्रत्यक्षात लाजण्याऐवजी हसत होती आणि हसताना हलत होती. कुणालने हसत हसत मान्य केले की तो हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात खराब आणि विचित्र किसिंग सीन होता. नंतर एका व्हिडीओमध्ये सैफनेही या गोष्टीची आठवण काढत राणीची खिल्ली उडवली होती की कसं राणीने त्याला सांगितले होते की 'तूच दिग्दर्शकाला सांग की तुला मला किस करायचे नाहीये'.