AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो आमिर खानला मारून टाकेल, त्याला 5 कोटी रुपये..; जगदगुरू परमहंस यांचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. करण सेनापासून राजकारणी व्यक्तींनीही त्याच्या या लग्नावरून टीका केली आहे. आता तपस्वी छावणीचे पिठाधीश्वर यांनी थेट आमिरला जीवे मारणाऱ्याला पाच कोटी रुपये बक्षीसाची घोषणा केली आहे.

जो आमिर खानला मारून टाकेल, त्याला 5 कोटी रुपये..; जगदगुरू परमहंस यांचं वादग्रस्त वक्तव्य
Aamir Khan and Gauri Spratt Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 15, 2026 | 9:15 AM
Share

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. 5 जुलै 2026 रोजी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. मात्र या लग्नावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आमिरला थेट ‘लव्ह जिहादचा ब्रँड एम्बेसेडर’च म्हटलं आहे. त्यानंतर आता तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगदगुरू परमहंस आचार्य यांनीसुद्धा नितेश राणेंच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आमिर खानला जीवे मारणाऱ्याला पाच कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

जगदगुरू परमहंस आचार्य म्हणाले, “ज्याप्रकारे आमिर खानने तीन लग्न केले आहेत आणि तिन्ही लग्न हिंदू महिलांशी केले आहे, त्यावरून हे दिसतंय की आता मरण्याच्या वयात तो फक्त ‘लव्ह जिहाद’चा संदेश देण्यासाठीच असा करतोय. नितेश राणे यांनी जे म्हटलंय ते फक्त आरोप नाहीत तर सत्य परिस्थिती आहे. अशा लोकांना जिथे दिसतील तिथेच मारून टाकलं पाहिजे.”

पहा व्हिडीओ-

याविषयी ते पुढे म्हणाले, “हे समाजातील मोठे गुन्हेगार आहेत, जे परस्पर सलोखा बिघडवण्यासाठी आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारे कट रचत आहेत. मी पाच कोटी रुपयांचं बक्षीसदेखील जाहीर करत आहे. जो कोणी कोणत्याही प्रकारे आमिर खानला पकडेल, आम्ही त्याचा कायदेशीर खर्च उचलू आणि त्याच्या कुटुंबाला पाच कोटी रुपये देऊ. जर असं 100-200 मोठे लव्ह जिहादी पकडले गेले, तर लव्ह जिहाद पूर्णपणे थांबेल.”

तपस्वी छावणीच्या प्रमुख पुजाऱ्यांनीही हे अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. “जर एका धर्मात आपल्या देवदेवतांची पूजा करण्यास मनाई असेल, तर ते आपल्या धर्मातील मुलीला कसं काय घेऊन जाऊ शकतात? हिंदू बहिणी आणि मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या अशा लोकांना जिवंत सोडणं चुकीचं आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं पाहिजे. मी उघडपणे सांगतो की, ज्यादिवशी कोणी आमिर खानला ठार मारेल, त्यादिवशी त्याच्या घरी पाच कोटी रुपये पोहोचवले जातील.”

आमिर खानने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. या दोन्ही पूर्व पत्नींपासून त्याला तीन मुलं आहेत. जुनैद खान, आयरा खान आणि आझाद राव खान अशी त्यांची नावं आहेत. आता वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं आहे.

Follow Us
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा