देशातील एकमेव रेल्वे स्थानक, जेथून प्रत्येक भारतीय परदेशातही प्रवास करू शकतो, काय आहे नाव?
भारतातील असं एक रेल्वे स्थानक जेथून कोणताही भारतीय देशाच्या प्रत्येक भागात प्रवास करू शकतो. तसेच तो परदेशातही जाऊ शकतो. कुठे आहे हे रेल्वे स्थानक?

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक असून देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानली जाते. कमी खर्चात, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वेमुळे दररोज लाखो प्रवासी देशाच्या विविध भागांत प्रवास करतात.

16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली प्रवासी रेल्वे धावली आणि त्यानंतर भारतीय रेल्वेने सातत्याने विस्तार करत आज देशभर विस्तीर्ण जाळे निर्माण केले आहे. सध्या भारतीय रेल्वेची विभागणी 18 झोनमध्ये करण्यात आली आहे.

मात्र, अनेकदा प्रवाशांना आपल्या गावापर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसते. अशा वेळी दोन किंवा तीन गाड्या बदलून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ अधिक लागतो आणि प्रवासही काहीसा कष्टदायक ठरतो.

परंतु भारतात एक असे रेल्वे स्थानक आहे, जिथून देशातील जवळपास प्रत्येक दिशेला जाणाऱ्या गाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना भारताच्या कोणत्याही भागात जाणे अधिक सोयीचे ठरते. विशेष म्हणजे, या स्थानकावरून आंतरराष्ट्रीय रेल्वे सेवेद्वारे भारताबाहेरील प्रवासाचाही पर्याय उपलब्ध आहे.

त्यामुळे हे स्थानक भारतीय रेल्वेतील सर्वाधिक महत्त्वाच्या आणि व्यस्त स्थानकांपैकी एक मानले जाते. देशभरातील रेल्वे संपर्कामुळे हे स्थानक प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरले असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही ते एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. ज्याचे नाव मथुरा जंक्शन आहे.