AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 10, 2023 | 11:37 PM
Share

मुंबई : येत्या अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी चिमटा काढलाय. बच्चू कडूंचा दावा नेमका काय आहे?. जे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, त्या बच्चू कडूंनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. इतर पक्षातले काही आमदार आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतो. तारखेवर तारीख येत आहे. त्याचं कारण एक तर कोर्ट आणि दुसरं कारण पक्षप्रवेश…10 ते 15 आमदार बऱ्य़ापैकी राहिलेल्या पक्षामधले फुटतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार

बच्चू कडूंनी आमदार फुटणार असल्याचा दावा केला असला तरी कुठल्या पक्षाचे आमदार फुटणार हे मात्र गुपीत ठेवलंय. आत्ताच याबाबत गौप्यस्फोट करु इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कुठल्या पक्षातले फुटतील ते मला स्पष्ट सांगता येणार नाही. हे गोपनीय आहे. तुम्हाला मोघमपणे सांगू शकतो. हेच फुटणार, याच पक्षाचे फुटणार हे नाही सांगू शकत. पण मला वाटतं 10 ते 15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार, असंही बच्चू कडू म्हणाले.

शहाजीबापू पाटील यांनी दिला दुजोरा

यावर संजय राऊत म्हणाले, स्वत: बच्चू कडू पण करतायत का? बघा कोण काय बोलतंय. त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बहुतेक मला माहिती आहे. भाजपचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडू यांची माहिती बरोबर आहे. बच्चू कडूंच्या दाव्याला शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनीही दुजोरा दिलाय.

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाच्या दाव्याला सहा महिन्यांचा कालावधी

जयंत पाटील म्हणाले, मला काहीही कल्पना नाही. बच्चू कडू काय म्हणाले त्याबद्दल मला कल्पना नाही. बच्चू कडूंनी आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा करुन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. त्यांचं हे स्वप्न अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं त्यांनी केलेल्या नव्या दाव्यावर संजय राऊत यांनी चांगलाच चिमटा घेतलाय.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......