AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

अधिवेशनाआधी १० आमदार फुटणार?; बच्चू कडू यांच्या दाव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले?
| Updated on: Feb 10, 2023 | 11:37 PM
Share

मुंबई : येत्या अधिवेशनाआधी विरोधी पक्षांचे 10 ते 12 आमदार फुटणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी चिमटा काढलाय. बच्चू कडूंचा दावा नेमका काय आहे?. जे मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत, त्या बच्चू कडूंनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय. इतर पक्षातल्या 10 ते 12 आमदारांचा भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होऊ शकतो असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. इतर पक्षातले काही आमदार आहेत. त्यांचाही पक्षप्रवेश कदाचित होऊ शकतो. तारखेवर तारीख येत आहे. त्याचं कारण एक तर कोर्ट आणि दुसरं कारण पक्षप्रवेश…10 ते 15 आमदार बऱ्य़ापैकी राहिलेल्या पक्षामधले फुटतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला.

15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार

बच्चू कडूंनी आमदार फुटणार असल्याचा दावा केला असला तरी कुठल्या पक्षाचे आमदार फुटणार हे मात्र गुपीत ठेवलंय. आत्ताच याबाबत गौप्यस्फोट करु इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलंय. कुठल्या पक्षातले फुटतील ते मला स्पष्ट सांगता येणार नाही. हे गोपनीय आहे. तुम्हाला मोघमपणे सांगू शकतो. हेच फुटणार, याच पक्षाचे फुटणार हे नाही सांगू शकत. पण मला वाटतं 10 ते 15 आमदार अधिवेशनाआधी फुटणार, असंही बच्चू कडू म्हणाले.

शहाजीबापू पाटील यांनी दिला दुजोरा

यावर संजय राऊत म्हणाले, स्वत: बच्चू कडू पण करतायत का? बघा कोण काय बोलतंय. त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बहुतेक मला माहिती आहे. भाजपचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडू यांची माहिती बरोबर आहे. बच्चू कडूंच्या दाव्याला शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनीही दुजोरा दिलाय.

शहाजीबापू पाटील म्हणाले, आमदार बच्चू कडू हे जबाबदारीनं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते जे म्हणालेत काँग्रेसचे 25 आमदार फुटीच्या मार्गावर आहेत तर फुटूही शकतात.

बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाच्या दाव्याला सहा महिन्यांचा कालावधी

जयंत पाटील म्हणाले, मला काहीही कल्पना नाही. बच्चू कडू काय म्हणाले त्याबद्दल मला कल्पना नाही. बच्चू कडूंनी आपल्याला मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा करुन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. त्यांचं हे स्वप्न अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं त्यांनी केलेल्या नव्या दाव्यावर संजय राऊत यांनी चांगलाच चिमटा घेतलाय.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.