AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणे-मुंडेंच्या वादात विलासराव मुख्यमंत्री, 1999 च्या पुनरावृत्तीची चिन्हं?

महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती 1999 ची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न निर्माण करणारी आहे.

राणे-मुंडेंच्या वादात विलासराव मुख्यमंत्री, 1999 च्या पुनरावृत्तीची चिन्हं?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 11, 2019 | 12:41 PM
Share

मुंबई : निवडणुकांपूर्वी शिवसेना-भाजप यांची झालेली युती मुख्यमंत्रिपदावरुन झालेल्या वादामुळे औपचारिक पातळीवर राहिली आहे. भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. आता पुरेसं संख्याबळ जमवण्यासाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मात्र महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती 1999 ची आठवण करुन देणारी आहे. वीस वर्षांतच इतिहासाची पुनरावृत्ती (1999 Maharashtra Vidhansabha Election) होणार का, असा प्रश्न आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरुन शिवसेनेसोबत त्यांची बोलणी फिस्कटली. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच्या भूमिकेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहिल्यामुळे भाजपने सत्तास्थापनेस नकार दिला. या राजकीय नाट्यानंतर 1999 ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

1999 मध्ये विधानसभा निवडणुकांनंतर काय झालं?

1999 च्या निवडणुकीत काँग्रेसला 75, शिवसेनेला 69, राष्ट्रवादीला 58, तर भाजपला 56 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर शिवसेना-भाजप यांची निवडणूकपूर्व युती झाली होती.

त्यावेळी शिवसेनेकडून नारायण राणे यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं तर, भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. 1999 मध्ये भाजपने शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र भाजपची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धुडकावून लावली होती.

महासेनाआघाडीच्या ‘पॉवरफुल’ महिला, वायरल फोटोमागील रहस्य काय?

शिवसेनेने सरकारस्थापनेचे प्रयत्न केले. परंतु त्याला यश काही आलं नाही. ही संधी साधत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणुकोत्तर आघाडी स्थापन केली. काँग्रेस राष्ट्रवादी यांचं एकत्रित संख्याबळ 75+58=133 झालं. अपक्ष आमदारांना सोबत घेऊन आघाडीने सरकार स्थापन केलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले.

आता पुन्हा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेला आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना आग्रही आहे. भाजपकडे आता 105 आमदार आहेत, तर पाठिंबा दिलेल्या अपक्षांसह त्यांचं संख्याबळ 116 वर जातं. शिवसेनेकडे 56 जागा असून पाठिंबा देणाऱ्या आमदारांसह त्यांच्याकडे 64 आमदारांचं संख्याबळ होतं. आघाडीचं बलाबल 98 आहे आणि 28 अपक्ष आमदार आहेत. शिवसेना आघाडीसोबत गेल्यास एकूण संख्याबळ होतं 162.

आता महाराष्ट्रात ‘महासेनाआघाडी’चं नवं त्रिसूत्री सरकार पाहायला मिळणार, की शिवसेनेला शह देऊन पुन्हा आघाडी 1999 ची पुनरावृत्ती करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार (1999 Maharashtra Vidhansabha Election) आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...