AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“टीएमसीचे 3 आमदार, 50 नगरसेवक भाजपात, आणखी 7 टप्प्यात भरती होणार”

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील 18 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रीत केलंय. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. दिल्लीत या नेत्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. 2017 मध्ये टीएमसीतून भाजपात सहभागी झालेले मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार शुभ्रांशू रॉयसह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये एका सीपीएमच्या […]

टीएमसीचे 3 आमदार, 50 नगरसेवक भाजपात, आणखी 7 टप्प्यात भरती होणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 28, 2019 | 5:21 PM
Share

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील 18 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक राजकारणावर लक्ष केंद्रीत केलंय. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केलाय. दिल्लीत या नेत्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. 2017 मध्ये टीएमसीतून भाजपात सहभागी झालेले मुकुल रॉय यांचा मुलगा आमदार शुभ्रांशू रॉयसह तीन आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये एका सीपीएमच्या आमदाराचाही समावेश आहे. बीजपूरचे आमदार शुभ्रांशू रॉय, आमदार तुषार कांती भट्टाचार्य आणि सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं.

भाजप आणि टीएमसीमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही पक्षांमध्ये हिंसाचारच्या घटना अनेकदा घडत असतात. पण ममता बॅनर्जींच्या आक्रमकतेला फोडाफोडीने उत्तर देण्याचा प्लॅन भाजपने केल्याचं दिसतंय. लोकसभेपूर्वी टीएमसीचे सात ते आठ खासदार भाजपात आले होते.

बंगालमधील काचरापारा महापालिकेचे 17 नगरसेवक भाजपात सहभागी झाले. यामध्ये महापौर आणि उपमहापौराचाही समावेश आहे. एकूण 26 सदस्य असलेल्या या महापालिकेतील 17 सदस्य भाजपात आल्याने इथे भाजपची सत्ता आली आहे. याशिवाय आणखी दोन महापालिकांवरही भाजपने वर्चस्व मिळवलंय. तीन महापालिकांमधील 50 नगरसेवक भाजपात सहभागी झाले.

आमदार आणि नगरसेवकांनी भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. टीएमसी आणखी धक्के देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा पहिला टप्पा आहे. ज्या प्रमाणे निवडणुकीत सात टप्पे झाले होते, त्याचप्रमाणे आणखी सात टप्प्यांमध्ये भरती केली जाईल, अशी माहिती विजयवर्गीय यांनी दिली.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली