AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2022 | 12:54 PM
Share

मुंबई: राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी थेट शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राने (maharashtra) पहिल्यांदा 80 हजार कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्यासाठी करार केले होते. केंद्र सरकार हेच होतं. राज्य सरकार महाविकास आघाडीचं (mahavikas aghadi) होतं. तरीही डबल इंजिन सुरू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यावर एक इंजिन फेल का गेलं? आमचं केंद्रा सोबत चांगलं चाललं होतं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घणाघाती हल्ला चढवला आहे.

आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी, फोडोफोडी हेच करत आहेत. हे सोडून मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात गेले नाही. शिवराज सिंह चौहान आपल्या राज्यात आले. नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. त्यांनी इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तसंच मला गेल्या तीन महिन्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन एखाद्या उद्योजकांशी चर्चा केल्याचं एक उदाहरण दाखवा. त्यांनी काहीच केलं नाही, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

आपल्या राज्यातील उद्योगही निघून जात आहे. या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकांचा विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक उद्योग आपल्या राज्यात येणार होता, तो येत नाही. गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती इतर राज्यात जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही. निवडणुकीला सामोरे जायला जो माणूस तयार नाही. ज्याच्यात हिंमत नाही. तो गुंतवणूक काय आणू शकतो?; असा सवाल त्यांनी केला.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पप्पू असा केला. त्यावर आदित्य यांनी टीका केली आहे. मी त्यांच्याबरोबर बसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जे विचारलं ते कदाचित करत नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल. काल खाती वाटप झालं. उद्योगमंत्र्याने शेतीबद्दल ट्विट केलं आहे. कृष मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातला आहे. कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहीत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं? अशी शेरेबाजी त्यांनी केली.

Follow Us
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम