AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2022 | 12:54 PM
Share

मुंबई: राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी थेट शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राने (maharashtra) पहिल्यांदा 80 हजार कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्यासाठी करार केले होते. केंद्र सरकार हेच होतं. राज्य सरकार महाविकास आघाडीचं (mahavikas aghadi) होतं. तरीही डबल इंजिन सुरू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यावर एक इंजिन फेल का गेलं? आमचं केंद्रा सोबत चांगलं चाललं होतं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घणाघाती हल्ला चढवला आहे.

आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी, फोडोफोडी हेच करत आहेत. हे सोडून मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात गेले नाही. शिवराज सिंह चौहान आपल्या राज्यात आले. नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. त्यांनी इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तसंच मला गेल्या तीन महिन्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन एखाद्या उद्योजकांशी चर्चा केल्याचं एक उदाहरण दाखवा. त्यांनी काहीच केलं नाही, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

आपल्या राज्यातील उद्योगही निघून जात आहे. या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकांचा विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक उद्योग आपल्या राज्यात येणार होता, तो येत नाही. गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती इतर राज्यात जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही. निवडणुकीला सामोरे जायला जो माणूस तयार नाही. ज्याच्यात हिंमत नाही. तो गुंतवणूक काय आणू शकतो?; असा सवाल त्यांनी केला.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पप्पू असा केला. त्यावर आदित्य यांनी टीका केली आहे. मी त्यांच्याबरोबर बसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जे विचारलं ते कदाचित करत नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल. काल खाती वाटप झालं. उद्योगमंत्र्याने शेतीबद्दल ट्विट केलं आहे. कृष मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातला आहे. कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहीत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं? अशी शेरेबाजी त्यांनी केली.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.