AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेगटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने!, अब्दुल सत्तार यांची खोचक टीका

आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिंदेगटातील आमदार नाराज असल्याचं म्हणण्यात आलं आहे.त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदेगटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने!, अब्दुल सत्तार यांची खोचक टीका
| Updated on: Oct 23, 2022 | 1:16 PM
Share

औरंगाबाद : आजच्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिंदेगटातील आमदार नाराज असल्याचं म्हणण्यात आलं आहे. शिंदे गटातील 22 आमदार नाराज आहेत, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे. त्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. शिंदे गटातील 22 आमदार नाराज म्हणणं म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, असं सत्तार (Abdul Sattar) म्हणालेत. तसंच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) औरंगाबाद दौऱ्यावरही टीका केली आहे.

22 आमदार नाराज हे मुंगेरीलाल के सपने आहेत. ते कधी खरे होत नाहीत. हे लोक गणपतीला आठवत बसले आहेत. कधीतरी हे 22 आमदार नाराज होतील. यांच्या पोटात जो पोटशूळ उठलेला आहे. तो कमी होईल, असं सत्तार म्हणालेत. त्यांच्याकडे जे उरलेले 15 आमदार आहेत. ते सांभाळले तरी फार झालं. त्यांनी आपले आमदार सांभाळावेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

सत्तार यांची उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया

निश्चितपणे उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांच्या शिवसेनेकडून मदत पण द्यायला हवी. परंतु जर केवळ राजकारण करण्यासाठी येत असतील तर याला जनता माफ करणार नाही. आगामी जिल्हा परिषद महापालिकेत शेतकरी यांना उत्तर देतील, असं सत्तार म्हणालेत.

उद्धव ठाकरेंनी निश्चितपणे रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण त्यांच्यावर आता रस्त्यावर उतरण्याची पाळी आलीय. पूर्वी ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होते. शेतकरी गोरगरिबांना मदत करायला हवी होती ती न केल्याने ही वेळ आली. शिवसेनेकडील 55 आमदारांची फौज होती. त्यापैकी 40 आमदार शिंदेगटात आहेत. उद्धव ठाकरेंकडे फक्त 15 आमदार राहिलेत. हे लोक आपल्याला सोडून का गेले याचं त्यांनी चिंतन करायला हवं, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.