AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे

"हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे", असं मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले (Abhijit Panse on MNS Maha Morcha).

मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे
| Updated on: Feb 09, 2020 | 6:40 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण झालं. आता या मोर्चानंतर राज ठाकरेचं पुढचं धोरण काय असणार? याबाबत मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे (Abhijit Panse on MNS Maha Morcha). मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती पानसे यांनी दिली.

“आजच्या मोर्चानंतर याच आठवड्यात राज ठाकरे महाराष्ट्राच्या विविध भागांचा दौरा करतील. हे भगवं वादळ फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात सुरु झालं आहे. अनेकजण मनसेत प्रवेशासाठी इच्छूक आहेत. मोठमोठ्या नेत्यांचा मनसेत प्रवेश होत आहे. त्यामुळे आता महराष्ट्राचं नेतृत्व राज ठाकरेंच्या हातात असेल”, असा दावा अभिजीत पानसे (Abhijit Panse on MNS Maha Morcha) यांनी केला.

“मोर्चाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. लोकं हिंदू जीमखान्यापासून आझाद मैदानापर्यंत चालत आले. हा प्रतिसाद राज ठाकरे यांच्या भूमिकेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत”, असंदेखील अभिजीत पानसे म्हणाले.

‘घुसखोरांना हाकलायलाच हवं’

“केवळ झेंडा बदलला म्हणून आम्ही हिंदूत्त्व झालो हे चुकीचं आहे. हिंदूत्व आमचा अजेंडा नव्हता, अशातला काही भाग नाही. हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार दहिहंडी उत्सव साजरा केला. झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली नाही. आजची जी भूमिका आहे ती पक्षाच्या आणि राजकारणापलीकडची भूमिका आहे. आज या देशात अनधिकृत पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहत असतील तर त्यांना हाकलायलाच हवं”, असं अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.