AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं (Riteish Deshmukh Mamata Banerjee )

महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन
ममता बॅनर्जी
| Updated on: May 06, 2021 | 11:40 AM
Share

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विराट विजय मिळवल्यानंतर ममतादीदींनी काल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (Actor Riteish Deshmukh congratulates West Bengal CM Mamata Banerjee on victory)

रितेश हा महाराष्ट्राचे माजी (दिवंगत) मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा धाकटा सुपुत्र. विलासरावांनी मनमोहन सिंह सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी (मे 2009 मे 2012) सांभाळली आहे. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची (मे 2009 ते मे 2011) धुरा होती. त्यामुळे रितेशने आपल्या वडिलांच्या सहकारी असलेल्या बॅनर्जींनाच शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशचे ट्वीट काय?

तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल ममताजी (दीदी) यांचे खूप खूप अभिनंदन. त्यांचा विजय विलक्षण होता. तृणमूल काँग्रेसच्या बाजूने प्रचंड जनादेश होता, अशा आशयाचे ट्वीट रितेशने केले आहे.

ममता बॅनर्जींना एकहाती बहुमत

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 292 पैकी तब्बल 213 जागांवर विजय संपादित करत एकहाती बहुमत मिळवलं आहे. 205 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला मात्र 77 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. (Actor Riteish Deshmukh congratulates West Bengal CM Mamata Banerjee on victory)

नंदिग्राममध्ये पराभवाचा धक्का

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला पूर्ण बहुमत मिळालं असलं तरी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघातून पराभव झाला. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता यांना 1953 मतांनी पराभूत केले.

6 महिन्यात ममतांना आमदार बनावं लागणार

भाजपचं तगडं आव्हान मोडून काढत ममता बॅनर्जी यांनी राज्यात एकहाती सत्ता मिळवली. त्यांनी 2016 पेक्षा चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. मात्र स्वतःचा पराभव झाल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पुढील सहा महिन्यात आमदार बनणं गरजेचं आहे.

सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

ममता बॅनर्जी या सलग तिसऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या आहेत. पहिल्यांदा 2011 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी 34 वर्षे सत्ते असलेल्या डाव्यांना खुर्चीवरुन खाली खेचलं होतं. त्यावेळी ममता यांचा टाईम्सच्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या.

संबंधित बातम्या :

विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशचा भावनिक व्हिडिओ

West Bengal Result : पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच शून्यावर!

(Actor Riteish Deshmukh congratulates West Bengal CM Mamata Banerjee on victory)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.