AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये’, आदित्य ठाकरेंचा जोरदार टोला

सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय.

'सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये', आदित्य ठाकरेंचा जोरदार टोला
आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 9:24 PM
Share

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) 10 मार्चनंतर पडणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील सरकार आपल्या ओझ्यानं पडेल असं सातत्यानं सांगतात. यावरुन युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फडणवीस आणि भाजपला जोरदार टोला लगावलाय. सरकार गेल्यापासून दोन वर्षात फडणविसांमध्ये फ्रस्ट्रेशन आलं आहे. विरोधी पक्षाच्या वागण्यात ते दिसत आहे. कधी म्हणतात मुख्यमंत्री आहे, कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात सरकार आहे, तर कधी म्हणतात नाही. मात्र, लोकांचा सरकारवर विश्वास आहे. जे डोळे बंद करुन फिरतात त्यांना काहीच दिसणार नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय. ते आज चंद्रपूर दौऱ्यावर होते.

‘आम्ही सगळे संजय राऊतांसोबत’

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली असून, त्यांची चौकशी सुरु आहे. अशावेळी संजय राऊत यांनीही ईडीच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर अजून दोन पत्रकार परिषद घेत भाजपची पोलखोल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या मुद्दावर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता आम्ही सगळे संजय राऊत यांच्या सोबत आहोत, तिन्ही पक्ष एकमेकांच्या सोबत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

रामाळा तलावाच्या कामाची पाहणी

दरम्यान, आदित्य ठाकरे आज चंद्रपूर दौऱ्यावर होते. शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाच्या काठाशी त्यांनी तलावाच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली. ईको प्रो पर्यावरण संस्थेच्यावतीने गेली काही वर्षे या ऐतिहासिक तलावाला इकोर्निया- सांडपाणीमुक्त करून वैभव प्राप्त करण्याचा लढा उभारला होता. यासाठी मागील डिसेंबर महिन्यात उपोषणही करण्यात आलं होतं. यासंदर्भात पर्यावरण, पर्यटन, खनिज विकास निधी, जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक मोठा आराखडा तयार करण्यात आला. सुमारे 50 कोटी रुपयांच्या एकूण कामातील पहीला टप्पा सुरू झाला आहे.

हेरिटेज वॉकमध्ये सहभाग

आपल्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी ईको प्रो संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गोंडकालीन 12 किलो मीटर लांब किल्ला परकोट ‘हेरिटेज वॉक’च्या बगड खिडकी टप्प्याची पाहणीही केली. विशेष बाब म्हणते आदित्य ठाकरे या वॉकमध्येही सहभागी झाले. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागाच्या आढावा बैठकीतही सहभाग घेतला.

इतर बातम्या :

‘विरोधकांचं मनाचे मांडे खाण्याचं काम सुरु’, चंद्रकांतदादांच्या सरकार पडण्याच्या दाव्याची एकनाथ खडसेंनी उडवली खिल्ली

अमित शाह म्हणाले, ‘ना घर का ना घाट का’, आता हरीश रावत यांचं ‘जरुरत पडी तो काटुंगा भी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक पण एक खिडकी खुली?.
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!
संतप्त शेतकऱ्यांची नार्वेकरांच्या सहकाऱ्याला मारहाण!.
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!
ठाकरे बंधूंच्या युतीत 'मिठाचा खडा'वरुन देशपांडेंवर निशाणा!.
भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप
भाजपच्या मंत्र्याकडून शिंदेंकडच्या नगरविकास खात्यावर पुन्हा आरोप.
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात
Narhari Zirwal : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले तिसरे मंत्री वादात.
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....