AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैदान कौंनसा भी हो… साथ में खेलना है और साथ जितना है… आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

हे सरकार घटनाबाह्य आहे; 40 लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

मैदान कौंनसा भी हो... साथ में खेलना है और साथ जितना है... आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 09, 2022 | 9:59 AM
Share

 रोहा, रायगडः मैदान कौंनसा भी हो साथ में खेलना है ओर साथ मे जितना है. मातीत खेळण्याची मजा वेगळीच असते; आताच्या काळात आर्टिफिशियल मैदानं आहेत. आपण आपली माती आपली माणसं म्हणतो, तेच चित्र मैदानात असतं, असं वक्तव्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं. रायगड जिल्ह्यातील रोहा आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. खोखो क्रिडापटूंना बोलताना आदित्य ठाकरेंनी प्रोत्सहनपर भाषण केलं तसंच राजकीय शत्रूंवर टीकाही केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला उपस्थित होते.

गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले तसे कर्नाटक निवडणुकीसाठी राज्यातील गावं पळवतील, अशी सडकून टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. मातीतल्या खेळांना महत्व दिलं पाहिजे, मैदाने वाचवली पाहिजे असं मत आदित्य ठाकरे यानी व्यक्त केलं.

राज्यात विविध गटांकडून दबावतंत्र सुरु आहे, यावर बोट ठेवताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योग, राजकीय असेल, देशाला एकत्र आणण्याचं काम खेळासारखा दुसरं काही नाही. महाराष्ट्राला प्रत्येक बाजूने दाबण्याचा प्रयत्न करत आहे. उद्योग, गावे, जिल्हे दुसऱ्या राज्यात जात आहेत. तसेच महापुरुषांचा अपमान देखील होत असल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, या रोह्यात बल्क ड्रग प्रकल्प आणणार होतो दुसऱ्या राज्यात गेला. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार बसल्यानंतर पाच प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. बल्क ड्रक प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. बेळगाव बाबत हे सरकार बोलत नाही घाबरट सरकार आहे. असे अनेक विषय आहेत, महिला अत्याचार, शेतकरी असे अनेक प्रश्न असून दुसरं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. हे राजकारण आहे. हे राजकारण दूषित करायचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी देशातील विधानसभा निवडणूक निकालांवर भाष्य केलं. सर्व विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, या विजयानंतर आता तरी महाराष्ट्रात निवडणुका घेतील. हे सरकार घटनाबाह्य आहे; 40 लोक गद्दार आहेत. आता तरी निवडणुका घ्या आता कशाला घाबरत आहे, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....