AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे की फडणवीस? पुढचा मुख्यमंत्री कोण असावा?; अब्दुल सत्तार यांनी सांगितली ‘मन की बात’

या देशात कोणाकडे खासदार किती आहेत त्यावर पंतप्रधान ठरवत असतो. त्यामुळे त्यांनी आधी तेवढे खासदार निवडून आणावेत आणि करावा त्यांचा पंतप्रधान, असं ते म्हणाले.

शिंदे की फडणवीस? पुढचा मुख्यमंत्री कोण असावा?; अब्दुल सत्तार यांनी सांगितली 'मन की बात'
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 28, 2022 | 9:23 AM
Share

परभणी: पुढचा मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजपचाच (bjp) असेल असं विधान शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी काल केलं. शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं ठोस म्हटलं नाही. पण कृषी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी मात्र आपली मन की बात जाहीर केली आहे. पुढचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहावेत अशी माझी इच्छा आहे, असं अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी म्हटलं आहे. परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात वाद सुरू आहेत. त्यावरही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सरकारमध्ये सगळं वेल अँड गुड आहे. मोठा परिवार आहे. त्यामुळे छोट्या फार गोष्टी होत असतात. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सरकारला अजिबात धोका नाही. शिवाय हे प्रकरण हाताळण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. पुढचे दोन वर्षे हेच मुख्यमंत्री राहतील. माझी तर इच्छा आहे की पुढेही हेच मुख्यमंत्री असावेत, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे चित्रं छापण्याची मागणी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसासाठी दैवत आहे. मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे. माझ्या हातात असतं तर नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापण्याची मी लगेच ऑर्डर काढली असती, असं ते म्हणाले. त्यामुळे सत्तार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला काय? अशी चर्चा जोरदार रंगली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अब्दुल सत्तार अण्णांचं मंत्रीपद काढून त्यांना बिन खात्याचे मंत्री करावं, अशी मागणी केली आहे. त्यावर, अमोल काय एवढा मोठा नाही की आपण इतक्या लोकांत त्याची चर्चा करावी. कोणाला टीव्हीवर येण्यासाठी काही बोलावे लागते त्याचाच हा एक भाग आहे. राहिला विषय अमोल याच्याबद्दल ते काय बोलले हे मला माहीत आहे, मात्र हे बोलणं उचित होणार नाही. नाहीतर मला कोणाचं काय करायचं हे चांगलं माहीत आहे, असा इशारा त्यांनी दिला.

रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही आमदारांचे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यायचा, त्यासाठी ते स्वतंत्र आहेत. मात्र माझी दोघांनाही विनंती आहे की, सरकारमध्ये असताना दोघांनी भांडण करू नये. राज्याच्या विकासासाठी काय करता येईल हे दोघांनी पहावं, असं ते म्हणाले.

या देशात कोणाकडे खासदार किती आहेत त्यावर पंतप्रधान ठरवत असतो. त्यामुळे त्यांनी आधी तेवढे खासदार निवडून आणावेत आणि करावा त्यांचा पंतप्रधान, असं ते म्हणाले. एमआयएमचे नेते ओवैसी यांनी मला हिजाब घातलेली मुलगी पंतप्रधान झालेली पाहायची आहे, असं म्हटलं होतं. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांनी हे उत्तर दिलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.