AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला
ROHIT PAWARImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 16, 2023 | 10:50 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरला कर्जत (Ahmednagar karjat) तालुक्यात रब्बी हंगामात (Rabi season) यंदा विक्रमी कांदा लागवड झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कांद्याच्या कोसळत्या दरावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सध्या सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही” असा टोला त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. “त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होतोय, लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सरकार स्थापण झाल्यापासून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे शिंदे फडणवीस सरकार (shinde fadanvis government) दुर्लक्ष करीत आहे.

रब्बी हंगामात यंदा विक्रमी कांदा लागवड

विशेष म्हणजे यंदा कर्जत तालुक्यात रब्बी हंगामात विक्रमी कांद्या लागवड करण्यात आली आहे. 15 हजार हेक्टरच्या कांदा लागवड झाल्याने कांद्याचे उत्पादन सुध्दा वाढणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकरीवर्ग मोठा अडचणीत आला आहे. यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. अतिवृष्टीमध्ये कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. उर्वरित कांद्याला दर मिळत नाही, कांद्याचे दर यावर्षी दहा रुपयांच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, तर कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला…

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. या सगळ्या प्रकरणाची दखल राज्य सरकारने घ्यायला हवी होती. कांद्याचे दर घसरत असताना सुद्धा सरकार एकदम शांत आहे. अद्याप एकही बैठक घेतली नसून नाफेडला एक पत्र सुध्दा पाठवलेलं नाही अशी टीका रोहित पवारांनी केली.

कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या रोज बातम्या कानावर पडत असतात, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने हवी तशी मदत करीत नसल्याचे शेतकरी जाहीरपणे सांगत आहेत. कांद्यासह कापूसाचे दर सु्द्धा कोसलळे आहेत. कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.