AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला
ROHIT PAWARImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 16, 2023 | 10:50 AM
Share

अहमदनगर : अहमदनगरला कर्जत (Ahmednagar karjat) तालुक्यात रब्बी हंगामात (Rabi season) यंदा विक्रमी कांदा लागवड झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कांद्याच्या कोसळत्या दरावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सध्या सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही” असा टोला त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. “त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होतोय, लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सरकार स्थापण झाल्यापासून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे शिंदे फडणवीस सरकार (shinde fadanvis government) दुर्लक्ष करीत आहे.

रब्बी हंगामात यंदा विक्रमी कांदा लागवड

विशेष म्हणजे यंदा कर्जत तालुक्यात रब्बी हंगामात विक्रमी कांद्या लागवड करण्यात आली आहे. 15 हजार हेक्टरच्या कांदा लागवड झाल्याने कांद्याचे उत्पादन सुध्दा वाढणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकरीवर्ग मोठा अडचणीत आला आहे. यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. अतिवृष्टीमध्ये कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. उर्वरित कांद्याला दर मिळत नाही, कांद्याचे दर यावर्षी दहा रुपयांच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, तर कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला…

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. या सगळ्या प्रकरणाची दखल राज्य सरकारने घ्यायला हवी होती. कांद्याचे दर घसरत असताना सुद्धा सरकार एकदम शांत आहे. अद्याप एकही बैठक घेतली नसून नाफेडला एक पत्र सुध्दा पाठवलेलं नाही अशी टीका रोहित पवारांनी केली.

कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या रोज बातम्या कानावर पडत असतात, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने हवी तशी मदत करीत नसल्याचे शेतकरी जाहीरपणे सांगत आहेत. कांद्यासह कापूसाचे दर सु्द्धा कोसलळे आहेत. कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.