AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात
अजित पवार, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Google
| Updated on: Aug 17, 2022 | 10:01 AM
Share

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी पहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे. राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे पत्र प्राप्त झाले, त्यातून लक्षात येते की त्यांना आपण सत्तेत होतो, याचे विस्मरण झाले आहे. गजनीसारखी त्यांची अवस्था झाल्याचं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

आज कोणत्या विषयांवर चर्चा

आजपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावरून विरोधक सुरुवातीपासूनच सरकारवर टीका करत आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करू शकतात.

तयारी साठी कमी वेळ

दरम्यान दुसरीकडे मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने मंत्री विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोनच दिवसांपूर्वीच खाते वाटप जाहीर झाल्यामुळे मंत्र्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला असल्याची शक्यता  कमी आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....