AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात
अजित पवार, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Google
| Updated on: Aug 17, 2022 | 10:01 AM
Share

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी पहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे. राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे पत्र प्राप्त झाले, त्यातून लक्षात येते की त्यांना आपण सत्तेत होतो, याचे विस्मरण झाले आहे. गजनीसारखी त्यांची अवस्था झाल्याचं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

आज कोणत्या विषयांवर चर्चा

आजपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावरून विरोधक सुरुवातीपासूनच सरकारवर टीका करत आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करू शकतात.

तयारी साठी कमी वेळ

दरम्यान दुसरीकडे मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने मंत्री विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोनच दिवसांपूर्वीच खाते वाटप जाहीर झाल्यामुळे मंत्र्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला असल्याची शक्यता  कमी आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.