AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत.

Maharashtra Monsoon Session : सरकारने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, अजित पवारांचा घणाघात
अजित पवार, विरोधी पक्षनेतेImage Credit source: Google
| Updated on: Aug 17, 2022 | 10:01 AM
Share

मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होत आहे.  यंदाचं पावसाळी अधिवेशन दरवेळीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मिळत आहेत. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुगलबंदी पहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे. राज्यातील सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधडया उडवत स्थापन झाले आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले हे सरकार अद्याप विधिमान्य नाही. राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे पत्र प्राप्त झाले, त्यातून लक्षात येते की त्यांना आपण सत्तेत होतो, याचे विस्मरण झाले आहे. गजनीसारखी त्यांची अवस्था झाल्याचं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

आज कोणत्या विषयांवर चर्चा

आजपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावरून विरोधक सुरुवातीपासूनच सरकारवर टीका करत आहेत. अधिवेशनात या मुद्द्यावरून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा मुद्दा देखील विरोधक उपस्थित करू शकतात.

तयारी साठी कमी वेळ

दरम्यान दुसरीकडे मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने मंत्री विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोनच दिवसांपूर्वीच खाते वाटप जाहीर झाल्यामुळे मंत्र्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला असल्याची शक्यता  कमी आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.