AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात मंत्रिपदांची खांदेपालट कधी होणार, अजितदादांनी थेट वेळच सांगितली; नेमकं काय म्हणाले?

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय. त्यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराची थेट तारीखच सांगून टाकलीय

राज्यात मंत्रिपदांची खांदेपालट कधी होणार, अजितदादांनी थेट वेळच सांगितली; नेमकं काय म्हणाले?
ajit pawar
Follow us
| Updated on: Apr 26, 2025 | 10:14 PM

Ajit Pawar On Cabinet Expansion : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. 2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र मिळून लढवली. त्याचेच फळ म्हणून आज हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. दरम्यान, तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशीच चढाओढ पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे या तिन्ही पक्षांतर्गतही मंत्रिपदाला गवसणी घालण्यासाठी शर्यत लागली होती. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार हिंगोलीत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. भाषणादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळाची खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलं. “अडीच वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असा शब्द दिलेला आहे. तो शब्द मी पाळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका,” असं अजित पवार यांनी म्हटलंय.

अजितदादा अडीच वर्षांचा फॉर्म्यूला पाळणार का?

राज्यात 2024 सालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. यावेळी आम्हालाच महत्त्वाची खाती मिळावी, यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिपदं देताना अडीच वर्षांचा विशेष फॉर्म्यूला ठरवला होता.

नेमकं काय ठरलं होतं?

सध्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली होती, त्यांना पुढच्या अडीच वर्षांनी खुर्ची खाली करावी लागणार, असे त्यावेळी ठरले होते. म्हणजेच या पुढच्या अडीच वर्षांनी नव्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्याचा फॉर्म्यूला समोर ठेवला होता. याच फॉर्म्यूलाचा अजित पावर यांनी हिंगोलीत नव्याने उल्लेख केला आहे. मी नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असं असं मी म्हटलं होतं, तो शब्द मी पाळणार, असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोणाला नव्याने मंत्रिपदाची खुर्ची मिळणार?

अजित पवार यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होणार? बदल झालेच तर कोणत्या नवीन लोकांना मंत्रिपदाची खुर्ची भेटणार? याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. विशेष म्हणजे पक्षातील असंतुष्ट नेत्यांना अजित पवार कोणती मंत्रिपदं देणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव
विमान दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी
विमान दुर्घटनेतल्या वस्तीगृहातल्या विद्यार्थ्यांनी सांगितली आँखों देखी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले.
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण
मृतांच्या 192 नातेवाईकांच्या DNA चाचण्या पूर्ण.
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं
लकी नंबरनेच केला रुपाणींचा घात, त्याच तारखेला मृत्यूने कवटाळलं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न..
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर राज ठाकरेंनी उपस्थित केले मोठे प्रश्न...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्...
टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं अन्....
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?
विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं काय केलं होतं ट्विट?.
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP
लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील सर्वच 242 जणांचा मृत्यू - AP.
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवाशी असलेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?.