AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसाममध्ये अडकलेले तरुण अखेर महाराष्ट्रात दाखल होणार, अजित पवारांच्या पुढाकारानं सुटका

80 तरुणांना आसाममधून सोडण्यात आलं आहे. हे तरुण रेल्वेद्वारे महाराष्ट्रात येत असून ते उद्या किंवा परवा राज्यात दाखल होणार आहे. या तरुणांची कोरोना चाचणी करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच हे तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना एका कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तिथे त्यांना मोठ्या असुविधांना सामोरं जावं लागत होतं.

आसाममध्ये अडकलेले तरुण अखेर महाराष्ट्रात दाखल होणार, अजित पवारांच्या पुढाकारानं सुटका
आसाममध्ये अडकलेले तरुण महाराष्ट्रात परतणार
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 16, 2022 | 6:59 PM
Share

मुंबई : लष्करी भरतीसाठी (Army Recruitment) आसाममध्ये गेलेले आणि तिथेट अडकून पडलेल्या तरुणांची अखेर सुटका होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर अखेर या तरुणांची सुटका होणार आहे. एकूण 80 तरुणांना आसाममधून सोडण्यात आलं आहे. हे तरुण रेल्वेद्वारे महाराष्ट्रात येत असून ते उद्या किंवा परवा राज्यात दाखल होणार आहे. या तरुणांची कोरोना चाचणी करुन त्यांना सोडण्यात आलं आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच हे तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेले होते. मात्र, तिथे त्यांना एका कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि तिथे त्यांना मोठ्या असुविधांना सामोरं जावं लागत होतं.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रातून अनेक तरुण आसाममध्ये लष्करी भरतीसाठी गेले होते. त्यावेळी तिथे त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात हे तरुण निगेटिव्ह आल्याचा त्यांचा दावा आहे. असं असलं तरी त्यांना एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना चांगलं जेवण, पाणी मिळत नाही. तसंच आसाममध्ये प्रचंड थंडी असताना या तरुणांना साधं पांघरायलाही मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली इथून सोडवणूक करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. या तरुणांनी एक व्हिडीओ काढून तिथल्या परिस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्नही केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार आसाममध्ये लष्करी भरती प्रक्रिया 7 आणि 8 जानेवारी दरम्यान होणार होती. त्यासाठी महाराष्ट्रातील दोनशे ते अडीचशे तरुण 3 जानेवारीला आसाम राज्यातील करबी अँगलाँग या जिल्ह्यातील दीपू शहरात दाखल झाले. तिथे त्यांची भरती प्रक्रिया पार पडणार होती. मात्र, भरतीपूर्वी या तरुणांची कोरोना रॅपीड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांसाठी अन्य मुलांनाही कॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं.

खाण्याची आबाळ, अन्य आजार जडण्याची भीती

कॉरंटाईन सेंटरमध्ये या मुलांना जेवण, पाण्यासह अन्य सुविधा मिळत नव्हत्या. दीपू हे थंड हवेचे पर्यटनस्थळ आहे. असं असताना या मुलांना पांघरायला चांगल्या शॉल किंवा अन्य काहीही देण्यात आलेलं नव्हतं. अशावेळी कोरोनाचं संकट असल्यानं या मुलांना अन्य आजार जडण्याची शक्यताही होती. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने याची दखल घेऊन या तरुणांना राज्यात परत आणण्याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी या तरुणांसह त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली होती.

इतर बातम्या :

‘शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण नको, त्यांच्या आदर्शावर चाला’, अरविंद सावंतांचा राणा दाम्पत्याला खोचक सल्ला

भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं परवानगी नाकारली, तरी ठाकरे मुर्दाबाद, पुतळ्यामागचे राजकारण काय?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?