AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील

दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावर टीका करत, त्यांची पराभवामुळे मस्ती जिरली असल्याची टीका केली होती. याला आता आढळराव पाटलांनीही ((Shivajirao Adhalrao Patil)) उत्तर दिलंय. मस्ती कुणाची जिरली आहे ते राज्यातलं शेंबडं पोरही सांगू शकेल, असं आढळराव पाटील म्हणाले.

स्वतःच्या मुलाला निवडून न आणता येणाऱ्याची मस्ती जिरली : आढळराव पाटील
| Edited By: | Updated on: Jul 20, 2019 | 3:57 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) पाटील यांच्यात शीतयुद्ध रंगलंय. दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावर टीका करत, त्यांची पराभवामुळे मस्ती जिरली असल्याची टीका केली होती. याला आता आढळराव पाटलांनीही (Shivajirao Adhalrao Patil) उत्तर दिलंय. मस्ती कुणाची जिरली आहे ते राज्यातलं शेंबडं पोरही सांगू शकेल, असं आढळराव पाटील म्हणाले.

प्रत्युतर देत शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर (Shirur loksabha election) येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माझ्यावर टीका करण्यात आली. परंतु ज्याला स्वतःच्या मुलाला मावळात निवडून आणता आलं नाही, त्यांनी माझ्यावर टीका करणं हा विनोद आहे. अजित पवार यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या मुलाला निवडून आणायला हवं होतं, असंही आढळराव पाटील म्हणाले.

मुलाच्या पराभवाने तोंड काळवंडलं असून मस्ती माझी नाही, तर मस्ती तुमची जिरली आहे, असा घणाघात शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. अजित पवार यांनी लोकसभेतील पराभवावरुन शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली होती. त्यावरून आता आढळराव पाटलांनी पलटवार केला. आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीतील ही जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

माझा पराभव करण्याची हिंमत राष्ट्रवादीत कधीच नव्हती आणि नसेल. त्यामुळेच मी तीन वेळा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात तीन वेळा निवडून आलो. माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हेने केला नाही, पराभव छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे झाला, असंही आढळराव पाटील म्हणाले. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. महाराजांची प्रतिमा पाहूनच लोकांनी मतदान केलं, असं यापूर्वीही आढळराव पाटील म्हणाले होते.

शिरुर आणि मावळ या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. मावळमध्ये अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला, तर शिरुरमध्ये आढळराव पाटलांचा निसटता पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत शिरुरमधून विजय मिळवला होता.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.