AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा घणाघाती हल्ला

Ambadas Danve : सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? जर सामना कागदाचा लगदा आहे तर मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना...

Ambadas Danve : गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा घणाघाती हल्ला
गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी; अंबादास दानवे यांचा घणाघाती हल्लाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 15, 2022 | 1:48 PM
Share

औरंगाबाद: सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी शिवसेनेवर (shivsena) केली होती. शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती मिळाल्याने सामनातून ही टीका करण्यात आली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाटील यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी समाचार घेतला आहे. याच गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. त्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपने महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

दानवेंचे शेलारांना सवाल

मुंबईतून भ्रष्टाचाराची कीड उखडून फेकू असं विधान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेलारांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करू नये. ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे. जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं? ही कीड शेलारांनी दूर केलीय का? असा सवाल त्यांनी केला.

लगदा उलटा घुसतो

सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? जर सामना कागदाचा लगदा आहे तर मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना, असा इशाराही त्यांनी दिला.

खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सामनातील टीकेवर भाष्य करताना शिवसेनेवर हल्ला चढवला होता. सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. खातं कुणाला कोणतं आलं त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे. म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.