AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर आळस करायचा नाही…. उद्धव ठाकरे यांना कुणी टोला मारला?

अमरावती येथील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान आमदार बच्चू कडू बोलत होते.

Video | एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर आळस करायचा नाही.... उद्धव ठाकरे यांना कुणी टोला मारला?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 05, 2022 | 3:11 PM
Share

अमरावतीः प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव न घेता त्यांना टोमणा मारला. खास विदर्भाच्या भाषेत त्यांनी सुनावलं. माणसानं एकतर राजा व्हाचं नाही आणि झालं तर आळस कराचा नाही.. नाही तर अशा राजाचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलं, अशा शब्दात बच्चू कडू यांनी टोला लगावला.

प्रामाणिकता महत्त्वाची आहे. मी राजा झालो म्हणून झोपायचं, ठरलेल्या वेळातच भेटायचं, असं चालणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले. अमरावती येथील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान आमदार बच्चू कडू बोलत होते.

महिला मुख्यमंत्र्यावर काय प्रतिक्रिया?

उद्धव ठाकरे यांनी महिला मुख्यमंत्री पदाचे सूतोवाच केल्यानंतर हा विषय चांगलाच चर्चेत आहे. अमरावतीत बोलताना बच्चू कडू यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांना महिला मुख्यमंत्री करायचा होता तर तेव्हाच करायला पाहिजे होता. तुमच्यापेक्षा बरं राहिलं असतं, असं बच्चू कडू म्हणाले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्यानंतर प्रथमच आमदार बच्चू कडू अमरावतीत आले. दिव्यांग बांधव व प्रहार कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तर एका पत्रावर त्यांनी दिव्यांग मंत्रालय उभारलं… तर आता पूर्ण भारतभर दिव्यांग मंत्रालयाचा पायंडा पडणार असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय केलं आता पूर्ण भारतभर व्हावं, यासाठी आम्ही लढा उभारणार अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....