AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीच्या निशाण्यावर 3 विक्रम, दिल्ली विरुद्ध हॅट्रिक करण्याची संधी, यशस्वी होणार?

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals WPL Final 2026 : स्मृती मंधाना हीने तिच्या नेतृत्वात आरसीबीला दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचवलंय. आता आरसीबीसमोर अंतिम फेरीत दिल्लीचं आव्हान आहे. स्मृतीच्या निशाण्यावर या सामन्यात 3 विक्रम आहेत.

WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीच्या निशाण्यावर 3 विक्रम, दिल्ली विरुद्ध हॅट्रिक करण्याची संधी, यशस्वी होणार?
Rcb Captain Smriti Mandhana WPL 2026Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Feb 05, 2026 | 5:18 PM
Share

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील अंतिम सामन्याच्या थराराला गुरुवारी 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. डब्ल्यूपीएलच्या ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. दिल्लीने जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण सलग चौथ्यांदा स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत धडक दिलीय. तर आरसीबीची अंतिम फेरीत पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. आरसीबीने 2024 साली पहिल्याच प्रयत्नात डब्ल्यूपीएल ट्रॉफी उंचावली होती. तर दिल्लीला गेल्या सलग 3 मोसमात अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलंय. अशात जेमिमाह कॅप्टन म्हणून दिल्लीची प्रतिक्षा संपवणार की स्मृती मंधाना त्याच्या नेतृत्वात आरसीबीला दुसरी ट्रॉफी मिळवून देणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

स्मृतीला विक्रमी कामगिरीची संधी

स्मृतीला अंतिम सामन्यानिमित्ताने या स्पर्धेत आणि चौथ्या मोसमात खास कामगिरी करण्याची संधी आहे. स्मृतीने अशी कामगिरी केल्यास चौथ्या मोसमात ती नंबर 1 फलंदाज ठरेल. स्मृतीला चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीला मागे टाकून सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. सोबतच स्मृतीला या स्पर्धेत 1 हजार धावा करणारी एकूण पाचवी तर आरसीबीची पहिला महिला फलंदाज हा बहुमान मिळवण्याची संधी आहे. स्मृतीला यासाठी किती धावांची गरज आहे? हे जाणून घेऊयात.

स्मृतीला किती धावांची गरज?

स्मृती मंधाना हीला चौथ्या मोसमात हरमनप्रीत कौर हीचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 53 धावांची गरज आहे. स्मृती सध्या चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. स्मृतीने 8 सामन्यांत 290 धावा केल्या आहेत. तर हरमनप्रीत कौर हीने 8 सामन्यांत 342 रन्स केल्या आहेत.

तसेच स्मृतीने अंतिम सामन्यात एकूण 64 धावा केल्यास खास विक्रमाची नोंद तिच्या नावावर होईल. स्मृती डब्ल्यूपीएल स्पर्धेत 1 हजार धावा करणारी एकूण पाचवी तर आरसीबीची पहिली महिला फलंदाज ठरेल. स्मृतीने आतापर्यंत 4 हंगामात 34 सामन्यांमध्ये 936 धावा केल्या आहेत.

हरमनप्रीतच्या विक्रमाची बरोबरी करणार?

दरम्यान हरमनप्रीत तिच्या नेतृत्वात एकाच संघाला 2 ट्रॉफी जिंकून देणारी एकमेव कर्णधार आहे. तर स्मृतीने आरसीबीला एकदा चॅम्पियन केलंय. आता स्मृतीने आरसीबीला जिंकवल्यास ती आपल्या संघाला 2 ट्रॉफी मिळवून देणारी स्पर्धेतील दुसरी कर्णधार ठरेल. स्मृती अशाप्रकारे हरमनप्रीतच्या विक्रमाचीही बरोबरी साधेल. अशात स्मृती मंधाना महाअंतिम सामन्यात 3 पैकी किती विक्रम करण्यात यशस्वी ठरते? हे निकालानंतर स्पष्ट होईल.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.