AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढली होती. आप यावेळी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र केजरीवाल लढणार नाहीत, असं आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी स्पष्ट केलंय. अरविंद केजरीवाल सध्या […]

यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढली होती. आप यावेळी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र केजरीवाल लढणार नाहीत, असं आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी स्पष्ट केलंय.

अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री असल्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याची कोणतीही योजना नाही. पक्षाचं संघटन ज्या ठिकाणी मजबूत आहे, तिथे आपचा उमेदवार दिला जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा निर्णय होईल, अशी माहितीही संजय सिंग यांनी दिली. वाचावाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणांहून त्यांचा विजय झाला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालचा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. 2009 साली इथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला होता.

2014 च्या निवडणुकीत मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टक्कर दिली होती. मोदींनी त्यावेळी 581022 म्हणजेच तब्बल 56 टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी 209238 मतं मिळवली होती. इतर पक्षांच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. काँग्रेसचे अजय राय यांना 75614, सपा उमेदवाराला 45 हजार, बसपा उमेदवाराला 60 हजार मतं मिळाली होती. मोदींनी जवळपास पावणे चार लाख मतांनी 2014 ला विजय मिळवला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.