AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : सत्ता येऊनही भाजपाच्या गोटात शांतता; कार्यकर्त्यांनी जल्लोष का केला नाही?, शेलारांनी सांगितलं नेमकं कारण

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊन भाजपाने सर्वांना धक्का दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra politics : सत्ता येऊनही भाजपाच्या गोटात शांतता; कार्यकर्त्यांनी जल्लोष का केला नाही?, शेलारांनी सांगितलं नेमकं कारण
आशिष शेलार, आमदारImage Credit source: tv9marathi
| Updated on: Jul 01, 2022 | 1:17 PM
Share

मुंबई :  गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतात आले. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळले. त्यानंतर भाजपाकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यामुळे फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच या शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्याकर्त्यांनी जल्लोष देखील केला नसल्याचे पहायला मिळत आहे. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यकर्त्यांचे खूप प्रेम आहे. साहाजिकच आपला नेता मुख्यमंत्री न झाल्याने त्यांनी जल्लोष केला नसल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

यावेळी बोलताना  आशिष शेलार यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधाला आहे. आमदार शिवसेनेतून का फुटले याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करायची गरज असल्याचे शेलाय यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आतातरी बडबड बंद करावी असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांनी त्यांचे काम चोख केले. भाजपाच्या आमदारांनी त्यांचे काम चोख केले आणि राज्यात हिंदुत्त्वाला पुढे घेऊन जाणारे सरकार स्थापन झाले, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

फडणवीस नाराज असल्याची चर्चा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा अंदाज बांधला जात होता. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात जल्लोषाला सुरुवात झाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या अवघ्या काही तास आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री असतील असे फडणवीस यांनी जाहीर केले. तर आपण या मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून फडणवीस हे नाराज असल्याचा अंदाज बाधला जात आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.