AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray : काय सांगता? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण..! पण कशासाठी वाचा सविस्तर

आता दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार आता कोणी वाचवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे. पण नव्याने सत्ता केव्हा स्थापन होणार याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगतानाच सध्याच्या राजकीय परस्थितीचा आनंदही होत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले आहे.

CM Uddhav Thackeray : काय सांगता? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण..! पण कशासाठी वाचा सविस्तर
आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुवाहटीला या असे आमंत्रणच दिले आहे.
| Updated on: Jun 24, 2022 | 5:26 PM
Share

मुंबई : (Maharashtra Politics) राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ होत असताना जर कोणी थेट मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आसामला येण्याचे आमंत्रण देत असेल सर्वांच्याच भुवया उंचावणार आहेत. पण हे झालंय..अहो खरं आसामचे (Assam CM) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आसाममध्ये या असे आमंत्रण दिलेले आहे. आता यावरुन आणखीन मोठ्या (Political affairs) राजकीय घडामोडी काय घडणार असा सवाल तुम्हाला पडला असेल पण त्यांनी राजकीय घडामोडीसाठी नाही तर आता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी असे म्हणत सध्याच्या राजकीय परस्थितीवर एक प्रकारे खिल्ली उडवली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांनी असे विधान करुन शिवसेनेला डिवचल्याचाच प्रकार केला आहे. मात्र, शिंदे गटाकडे वाढत्या संख्या बळामुळे आता महाविकास आघाडी धोक्यात हे निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची झालेली अवस्था पाहून त्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आसाममध्ये येण्याचे आमंत्रणच त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

सत्ता स्थापनेबद्दल अनभिज्ञ मात्र सध्याच्या परस्थितीचा आनंद

आता दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार आता कोणी वाचवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे. पण नव्याने सत्ता केव्हा स्थापन होणार याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगतानाच सध्याच्या राजकीय परस्थितीचा आनंदही होत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे सध्या उद्धव ठाकरेंकडील आमदारांची संख्या ही घटत आहे तर गुवाहटीमध्ये आमदारांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

शिंदे गटाला आमदारांचा वाढता पाठिंबा

दिवसेंदिवस शिंदे गटाकडील आमदारांची सख्या वाढत ही वाढत आहे. गुवाहटी येथील हॉटेलमध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकावर बैठका पार पडत असून सेत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून मात्र बोचरी टिका

राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ होत असताना भाजपाच्या नेत्यांनी मात्र, कमालीचे मौन पाळले आहे. असे असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडीशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. पण या बंडाच्यामागे कोण आहे. याबाबत शरद पवार यांनी भाजपाचे नाव घेतले आहे. यावर पाटलांनी बोचरी टिका केली आहे. पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अतिरेकी वापर करतात, असे ते म्हणाले. शिवाय मी रोज बातम्याही पाहत नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणाबद्दल फारशी कल्पना नसल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.