AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat | आधी दौरे केले असते तर आमदार भेटले असते, आदित्य ठाकरेंना औरंगाबाद आमदार संजय शिरसाट यांचा टोला

शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रभरात दौऱ्यावर आहेत. पुढील आठवड्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेदेखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

Sanjay Shirsat | आधी दौरे केले असते तर आमदार भेटले असते, आदित्य ठाकरेंना औरंगाबाद आमदार संजय शिरसाट यांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jul 23, 2022 | 6:05 PM
Share

औरंगाबादः आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) आधी दौरे केले असते तर आमदार भेटले असते. मग ही वेळ आली नसती. आम्ही मातोश्रीविरोधात कधीही बोलत नाहीत. पण वाचाळवीरांना समज दिली पाहिजे, असं वक्तव्य औरंगाबादचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलं आहे. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा महत्त्वाचा गड मानला जातो. मात्र याच जिल्ह्यातून पाच आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश केल्यामुळे येथील शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे राज्यभरात दौरे आयोजित करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा 22 आणि 23 जुलै रोजी औरंगाबादेत दौरा झाला. विशेष म्हणजे ज्या आमदारांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केला, त्याच आमदारांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे दौरे आयोजित कऱण्यात आले आहेत. आज पैठण आणि गंगापूरमध्ये आदित्य ठाकरेंचा दौरा होता. मात्र ठाकरे कुटुंबियांनी आधीच अशा प्रकारे शिवसैनिकांशी संवाद साधला असता तर आज ही वेळ आली नसती, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

आदित्य ठाकरेंना उद्देशून बोलताना संजय शिरसाट म्हणाले, ‘ आदित्य ठाकरेजी, थोडे आधी दौरे केले असते, आमदार भेटले सते. मग शिवसेनेवर ही वेळ आली नसती. आम्ही मातोश्री विरोधात बोलत नाहीत. पण वाचाळवीरांना वेळीच समज दिली पाहिजे. संजय राऊत ठाकरे कुटुंबाबद्दल काय बोलले बाहेर आल्यावर कळेल. जे आम्हाला गाढव बोलले ते राऊत स्वतःच गाढव आहेत… असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. आम्ही भाजप नेत्यांनी, फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानंतर मनावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेत्यांमध्ये अजूनही खदखद कायम असल्याचं बोललं जात आहे. यावर एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट म्हणाले, ‘ चंद्रकांत दादा बोलले ते त्यांच्या मनातील बोलले. भाजप कार्यकर्त्यांना वाटतही असेल. पण हा निर्णय चंद्रकांत दादा ,फडणवीस किंवा शिंदे घेतला नाही. पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतला. त्यांना वाटतंय यात गैर नाही…यामुळे काहीही अडचण येणार नाही, मतभेद होणार नाहीत…

एकनाथ शिंदेंचाही महाराष्ट्र दौरा

शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रभरात दौऱ्यावर आहेत. पुढील आठवड्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेदेखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटातर्फे राज्यभरात मेळावे आयोजित केले जात आहेत. अशा स्थितीत एकनाथ शिंदे गटाविरोधात वातावरणनिर्मिती होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. आठवड्यातील 4 दिवस मंत्रालयात काम तर तीन दिवस महाराष्ट्रात शिंदे यांचे दौरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?