जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर

भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधी तक्रारीला पाठिंबा दिला आहे (Babanrao Lonikar on Jalna Fund distribution).

जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 9:00 PM

जालना : भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधी तक्रारीला पाठिंबा दिला आहे (Babanrao Lonikar on Jalna Fund distribution). माझ्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची तिच तक्रार असल्याचं म्हटलंय. तसेच येणाऱ्या काळात काँग्रेसने सुरु केलेलं आंदोलन सर्व पक्षांचं होऊ शकतं, असा इशारा देखील सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांना आपलं वजन वापरुन निधी आणण्याची मागणी केली.

बबनराव लोणीकर म्हणाले, “काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची तक्रार खरी आहे. हीच तक्रार माझीही आहे. हीच तक्रार जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींचीही आहे. आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी जालना जिल्ह्यासाठी निधी दिला नाही.पालकमंत्र्यांनी देखील दिला नाही. त्यामुळेच आघाडीत आमदार गोरंट्याल यांनी ही तक्रार केली असावी. जालना शहरातील विकास असेल, रस्ते, पिण्याचं पाणी, परतूर शहरातील रस्ते अशी सर्व कामं ठप्प आहेत.”

“मी 5 वर्षात जालना नगरपालिकेसाठी 200 कोटीचा निधी आणला”

“नगरपालिका काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना अशी कोणाच्याही ताब्यात असो मी मंत्री असताना जालना शहरात 200 कोटी रुपयांचा निधी दिला. 145 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिले. याचा उपयोग पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनसाठी झाला. शहरातील रस्त्यासाठी पैसा दिला. मी 5 वर्षात 200 कोटीपेक्षा जास्त निधी जालना नगरपालिकेला दिला,” असं लोणीकर म्हणाले.

“भोकरदन, परतूर, मंठा, जालना यासह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेला 20 हजार कोटी रुपये दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भरपूर निधी दिला. नितीन गडकरी यांनी भरीव निधी दिला. जिल्ह्यामध्ये विकासाची कामे सुरु होती,” असंही त्यांनी नमूद केलं.

“जालन्यात काँग्रेसकडून आंदोलनाची सुरुवात, आता सर्वपक्षीय आंदोलन होईल”

बबनराव लोणीकर म्हणाले, “6 महिने झाले विकास ठप्प झाला आहे. आघाडी सरकाने जालन्याच्या विकासासाठी दमडीही दिलेली नाही. जिल्हा ठप्प झालाय, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळत नाही. जालन्यात आंदोलनाची सुरुवात कॉंग्रेसकडून झालीय. मात्र हे आंदोलन सर्वपक्षीय होऊ शकतं.” त्यामुळे स्वतः पालकमंत्री राजेश टोपे यांनी यात लक्ष घालावं. त्यांनी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपलं वजन वापरावं, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली.

संबंधित बातम्या :

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात

“कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी…” कैलास गोरंट्याल यांची शेरोशायरी

अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त टिकत नाही, अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा हल्लाबोल

संबंधित व्हिडीओ :

Babanrao Lonikar on Jalna Fund distribution

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.