AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर

भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधी तक्रारीला पाठिंबा दिला आहे (Babanrao Lonikar on Jalna Fund distribution).

जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर
| Updated on: Aug 25, 2020 | 9:00 PM
Share

जालना : भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधी तक्रारीला पाठिंबा दिला आहे (Babanrao Lonikar on Jalna Fund distribution). माझ्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची तिच तक्रार असल्याचं म्हटलंय. तसेच येणाऱ्या काळात काँग्रेसने सुरु केलेलं आंदोलन सर्व पक्षांचं होऊ शकतं, असा इशारा देखील सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांना आपलं वजन वापरुन निधी आणण्याची मागणी केली.

बबनराव लोणीकर म्हणाले, “काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची तक्रार खरी आहे. हीच तक्रार माझीही आहे. हीच तक्रार जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींचीही आहे. आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी जालना जिल्ह्यासाठी निधी दिला नाही.पालकमंत्र्यांनी देखील दिला नाही. त्यामुळेच आघाडीत आमदार गोरंट्याल यांनी ही तक्रार केली असावी. जालना शहरातील विकास असेल, रस्ते, पिण्याचं पाणी, परतूर शहरातील रस्ते अशी सर्व कामं ठप्प आहेत.”

“मी 5 वर्षात जालना नगरपालिकेसाठी 200 कोटीचा निधी आणला”

“नगरपालिका काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना अशी कोणाच्याही ताब्यात असो मी मंत्री असताना जालना शहरात 200 कोटी रुपयांचा निधी दिला. 145 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिले. याचा उपयोग पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनसाठी झाला. शहरातील रस्त्यासाठी पैसा दिला. मी 5 वर्षात 200 कोटीपेक्षा जास्त निधी जालना नगरपालिकेला दिला,” असं लोणीकर म्हणाले.

“भोकरदन, परतूर, मंठा, जालना यासह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेला 20 हजार कोटी रुपये दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भरपूर निधी दिला. नितीन गडकरी यांनी भरीव निधी दिला. जिल्ह्यामध्ये विकासाची कामे सुरु होती,” असंही त्यांनी नमूद केलं.

“जालन्यात काँग्रेसकडून आंदोलनाची सुरुवात, आता सर्वपक्षीय आंदोलन होईल”

बबनराव लोणीकर म्हणाले, “6 महिने झाले विकास ठप्प झाला आहे. आघाडी सरकाने जालन्याच्या विकासासाठी दमडीही दिलेली नाही. जिल्हा ठप्प झालाय, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळत नाही. जालन्यात आंदोलनाची सुरुवात कॉंग्रेसकडून झालीय. मात्र हे आंदोलन सर्वपक्षीय होऊ शकतं.” त्यामुळे स्वतः पालकमंत्री राजेश टोपे यांनी यात लक्ष घालावं. त्यांनी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपलं वजन वापरावं, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली.

संबंधित बातम्या :

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात

“कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी…” कैलास गोरंट्याल यांची शेरोशायरी

अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त टिकत नाही, अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा हल्लाबोल

संबंधित व्हिडीओ :

Babanrao Lonikar on Jalna Fund distribution

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...