AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandeep Kshirsagar : ‘मी ओबीसी आहे, पहिला ओबीसी आहे, जो…’ विराट मोर्चात संदीप क्षीरसागर काय म्हणाले?

Sandeep Kshirsagar : "अभिमन्यू पवार यांना मी बोललो होतो, लोकांमध्ये रोष आहे, हा जातीपातीचा मोर्चा नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध अठरापगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस गेला, त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमले आहेत. एसपीची बदली झाली. दोन नंबरचे धंदे बंद झालेत" असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

Sandeep Kshirsagar :  'मी ओबीसी आहे, पहिला ओबीसी आहे, जो...' विराट मोर्चात संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
sandeep kshirsagar
| Updated on: Dec 28, 2024 | 2:47 PM
Share

“त्या विंड मिलच्या प्रकारात तो वॉचमन बौद्ध समाजाचा होता. संतोष देशमुख मराठा समाजाचे होते. जेव्हा वॉचमनला तिथे मारहाण करण्यात आली. खंडणीसाठी वाल्मिक कराडचे गुंड लोक तिथे गेले. वॉचमनने त्यांना अडवलं म्हणून त्याला मारहाण केली. तिथे संतोष देशमुख यांनी उघड भूमिका घेऊन त्यांना रोखल” असं आमदार संदीप क्षीरसागर बीड येथील विराट मोर्चात सांगितलं. “मी ओबीसी आहे. पहिला ओबीसी आहे, जो ठामपणे सांगतो, वाल्मिक कराडला आत टाका. गावच्या लोकांना जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले, अधिवेशनात आवाज उठवू सांगितलं” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

“सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी, जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा त्यांनी संभागृहात साथ दिली. हा जाती-पातीचा विषय नाही. सुरुवातीला म्हटलेलं राजकारण आणणार नाही, या सर्वांनी साथ दिली. मुख्यमंत्री तसच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे बोलले, दोषी कोणी असेल तरी त्याला सोडणार नाही” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

‘अठरापगड जातीचे लोक घरचा माणूस गेला म्हणून एकत्र आले’

“अभिमन्यू पवार यांना मी बोललो होतो, लोकांमध्ये रोष आहे, हा जातीपातीचा मोर्चा नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध अठरापगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस गेला, त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमले आहेत. एसपीची बदली झाली. दोन नंबरचे धंदे बंद झाले. पण वाल्मिक कराडला अजून अटक झालेली नाही. खंडणीमुळे कनेक्शन 302 लागतं. 19 दिवस होऊनही त्याला अटक झालेली नाही” याकडे संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं. “मी मंतदारसंघाचा दौरा केला. तेव्हा लोकांकडून मागणी आली, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण आहे. हा खटला चालेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर