AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandeep Kshirsagar : ‘मी ओबीसी आहे, पहिला ओबीसी आहे, जो…’ विराट मोर्चात संदीप क्षीरसागर काय म्हणाले?

Sandeep Kshirsagar : "अभिमन्यू पवार यांना मी बोललो होतो, लोकांमध्ये रोष आहे, हा जातीपातीचा मोर्चा नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध अठरापगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस गेला, त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमले आहेत. एसपीची बदली झाली. दोन नंबरचे धंदे बंद झालेत" असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

Sandeep Kshirsagar :  'मी ओबीसी आहे, पहिला ओबीसी आहे, जो...' विराट मोर्चात संदीप क्षीरसागर काय म्हणाले?
sandeep kshirsagar
| Updated on: Dec 28, 2024 | 2:47 PM
Share

“त्या विंड मिलच्या प्रकारात तो वॉचमन बौद्ध समाजाचा होता. संतोष देशमुख मराठा समाजाचे होते. जेव्हा वॉचमनला तिथे मारहाण करण्यात आली. खंडणीसाठी वाल्मिक कराडचे गुंड लोक तिथे गेले. वॉचमनने त्यांना अडवलं म्हणून त्याला मारहाण केली. तिथे संतोष देशमुख यांनी उघड भूमिका घेऊन त्यांना रोखल” असं आमदार संदीप क्षीरसागर बीड येथील विराट मोर्चात सांगितलं. “मी ओबीसी आहे. पहिला ओबीसी आहे, जो ठामपणे सांगतो, वाल्मिक कराडला आत टाका. गावच्या लोकांना जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले, अधिवेशनात आवाज उठवू सांगितलं” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

“सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी, जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा त्यांनी संभागृहात साथ दिली. हा जाती-पातीचा विषय नाही. सुरुवातीला म्हटलेलं राजकारण आणणार नाही, या सर्वांनी साथ दिली. मुख्यमंत्री तसच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे बोलले, दोषी कोणी असेल तरी त्याला सोडणार नाही” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

‘अठरापगड जातीचे लोक घरचा माणूस गेला म्हणून एकत्र आले’

“अभिमन्यू पवार यांना मी बोललो होतो, लोकांमध्ये रोष आहे, हा जातीपातीचा मोर्चा नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध अठरापगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस गेला, त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमले आहेत. एसपीची बदली झाली. दोन नंबरचे धंदे बंद झाले. पण वाल्मिक कराडला अजून अटक झालेली नाही. खंडणीमुळे कनेक्शन 302 लागतं. 19 दिवस होऊनही त्याला अटक झालेली नाही” याकडे संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं. “मी मंतदारसंघाचा दौरा केला. तेव्हा लोकांकडून मागणी आली, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण आहे. हा खटला चालेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान