नितीश कुमारांचा मास्टरस्ट्रोक, केंद्राचा बदला राज्यात घेतला!

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनायटेड) अर्थत जेडीयूला मोदी सरकारने केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊ केलं होतं. ते मंत्रिपद नाकारत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नितीश कुमार यांनी राज्याच्या म्हणजे बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी मास्टस्ट्रोक मारत, […]

नितीश कुमारांचा मास्टरस्ट्रोक, केंद्राचा बदला राज्यात घेतला!
Follow us
| Updated on: Jun 02, 2019 | 5:03 PM

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनायटेड) अर्थत जेडीयूला मोदी सरकारने केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊ केलं होतं. ते मंत्रिपद नाकारत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नितीश कुमार यांनी राज्याच्या म्हणजे बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी मास्टस्ट्रोक मारत, भाजपला एकही नवीन मंत्रिपद दिलं नाही. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत.

केंद्राचा बदला राज्यात!

नितीश कुमार यांनी आज बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांच्या जेडीयूमधील आठ आमदारांचा समावेश झाला. विशेष म्हणजे, नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सत्तेतील भागीदार असलेल्या भाजप आणि लोजप यांच्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद देताना मान राखला नसल्याने त्याचा बदला नितीश कुमार यांनी राज्यात घेतला का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

बिहारच्या मंत्रिमंडळात नव्याने कुणाचा समावेश?

बिहारच्या मंत्रिमंडळात आठ आमदारांनी नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतली. हे आठही जण जेडीयूचे आमदार आहेत. यात अशोक चौधरी, श्याम रजक, रामसवेक सिंह, नीरज कुमार, बीमा भारती, नरेंद्र यादव, संजय झा आणि लक्ष्मेश्वर राय यांचा समावेश आहे.

नव्या मंत्र्यांचे काही वैशिष्ट्य

  • लक्ष्मेश्वर राय हे जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
  • नीरज कुमार हे 2009 पासून जेडीयूचे प्रवक्ता आहेत.
  • संजय झा हे भाजपमधून जेडीयूत आलेले नेते आहेत.
  • अशोक चौधरी हे काँग्रेसमधून जेडीयूत आलेले नेते आहेत.
  • नरेंद्र यादव हे आलमनगरमधून जेडीयूचे आमदार आहेत.
  • श्याम रजक हे तब्बल सहावेळा आमदार झाले आहेत.
  • बीमा भारती या बिहारमधील अतिमागास वर्गातील आमदार आहेत.
  • रामसेवक सिंह हे जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

भाजप आणि लोजपमधील एकाही आमदाराचा समावेश नाही!

बिहार मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष यांच्यातील एकाही आमदाराला मंत्री बनवलं नाही. केंद्रात नव्या मोदी सरकारकडून नितीश कुमार यांच्या जेडीयूला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, एक मंत्रिपद घेऊन केवळ नाममात्र प्रतिनिधित्व करण्यात रस नसून, आम्हाला मंत्रिपद नको, मात्र एनडीएसोबत राहू, अशी भूमिका घेत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. मात्र, राज्यातील म्हणजे बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी भाजप-लोजपला आसमान दाखवत, मास्टरस्ट्रोक मारला आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.