AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश कुमारांचा मास्टरस्ट्रोक, केंद्राचा बदला राज्यात घेतला!

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनायटेड) अर्थत जेडीयूला मोदी सरकारने केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊ केलं होतं. ते मंत्रिपद नाकारत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नितीश कुमार यांनी राज्याच्या म्हणजे बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी मास्टस्ट्रोक मारत, […]

नितीश कुमारांचा मास्टरस्ट्रोक, केंद्राचा बदला राज्यात घेतला!
| Edited By: | Updated on: Jun 02, 2019 | 5:03 PM
Share

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (यूनायटेड) अर्थत जेडीयूला मोदी सरकारने केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊ केलं होतं. ते मंत्रिपद नाकारत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात नितीश कुमार यांनी राज्याच्या म्हणजे बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी मास्टस्ट्रोक मारत, भाजपला एकही नवीन मंत्रिपद दिलं नाही. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत.

केंद्राचा बदला राज्यात!

नितीश कुमार यांनी आज बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांच्या जेडीयूमधील आठ आमदारांचा समावेश झाला. विशेष म्हणजे, नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सत्तेतील भागीदार असलेल्या भाजप आणि लोजप यांच्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे केंद्रात मंत्रिपद देताना मान राखला नसल्याने त्याचा बदला नितीश कुमार यांनी राज्यात घेतला का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

बिहारच्या मंत्रिमंडळात नव्याने कुणाचा समावेश?

बिहारच्या मंत्रिमंडळात आठ आमदारांनी नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतली. हे आठही जण जेडीयूचे आमदार आहेत. यात अशोक चौधरी, श्याम रजक, रामसवेक सिंह, नीरज कुमार, बीमा भारती, नरेंद्र यादव, संजय झा आणि लक्ष्मेश्वर राय यांचा समावेश आहे.

नव्या मंत्र्यांचे काही वैशिष्ट्य

  • लक्ष्मेश्वर राय हे जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
  • नीरज कुमार हे 2009 पासून जेडीयूचे प्रवक्ता आहेत.
  • संजय झा हे भाजपमधून जेडीयूत आलेले नेते आहेत.
  • अशोक चौधरी हे काँग्रेसमधून जेडीयूत आलेले नेते आहेत.
  • नरेंद्र यादव हे आलमनगरमधून जेडीयूचे आमदार आहेत.
  • श्याम रजक हे तब्बल सहावेळा आमदार झाले आहेत.
  • बीमा भारती या बिहारमधील अतिमागास वर्गातील आमदार आहेत.
  • रामसेवक सिंह हे जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

भाजप आणि लोजपमधील एकाही आमदाराचा समावेश नाही!

बिहार मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्ष आणि लोक जनशक्ती पक्ष यांच्यातील एकाही आमदाराला मंत्री बनवलं नाही. केंद्रात नव्या मोदी सरकारकडून नितीश कुमार यांच्या जेडीयूला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, एक मंत्रिपद घेऊन केवळ नाममात्र प्रतिनिधित्व करण्यात रस नसून, आम्हाला मंत्रिपद नको, मात्र एनडीएसोबत राहू, अशी भूमिका घेत नितीश कुमार यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. मात्र, राज्यातील म्हणजे बिहारमधील मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार यांनी भाजप-लोजपला आसमान दाखवत, मास्टरस्ट्रोक मारला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...