AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: आव्हाड, कांदे, ठाकूर यांचं मत बाद करा, भाजपची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, दोन मुख्य मुद्दे समजून घ्या

Rajya Sabha Election 2022: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना नियमांचा भंग केला आहे.

Rajya Sabha Election 2022: आव्हाड, कांदे, ठाकूर यांचं मत बाद करा, भाजपची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, दोन मुख्य मुद्दे समजून घ्या
आव्हाड, कांदे, ठाकूर यांचं मत बाद करा, भाजपची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2022 | 7:01 PM
Share

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान (Rajya Sabha Election) होऊन दोन तास उलटले तरी अजून मतमोजणी सुरू झालेली नाही. भाजपने (bjp) घेतलेल्या आक्षेपामुळे ही मतमोजणी सुरू झालेली नाही. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस (congress) नेत्या यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांची मते बाद करण्याची मागणी भाजपने केली आहे. या तिन्ही आमदारांनी नियमांचा भंग केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच या तिन्ही नेत्यांचे मते बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या मोजणीस विलंब होत आहे. आता या प्रकरणावर निवडणूक आयोग काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या शिष्टमंडळानंतर आता काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं मत बाद करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना नियमांचा भंग केला आहे. या तिघांनीही आपली मतपत्रिका इतरांना दाखवली आहे. त्यामुळे निवडणूक कार्यपद्धतीचा भंग झाला आहे, असं या लेखी तक्रारीत नमूद केलं आहे.

रिटर्निंग ऑफिसरचं दुर्लक्ष

2017मध्ये अहमद पटेल प्रकरणानंतर निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले होते. त्यानुसार निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर त्याचवेळी संबंधित व्यक्तीचं मत रद्द करण्याची तरतूद होती. या तिन्ही प्रकरणात भाजपच्या एजंटने रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, रिटर्निंग ऑफिसरने निवडणूक अधिनियम 1961च्या नियमाकडे दुर्लक्ष करून कोणत्याही तथ्यावर विचार न करता मतदान करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळेच आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल केली आहे, असं या तक्रार अर्जात म्हटलं आहे.

पटेल प्रकरणात काय झालं?

निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम आणि पटेल केसचा संदर्भ पाहता आम्ही या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करत आहोत. तसेच ही मते रद्द करण्याची मागणी करत आहोत. पटेल प्रकरणात 2017मध्ये निवडणूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावेळी निवडणूक आयोगाने मत रद्द करण्याचे आदेश दिले होते, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आलं आहे.

हरियाणातील प्रकाराचीही तक्रार

भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 2017 च्या निवडणुकीचा दाखला आम्ही दिला आहे. महाराष्ट्र, हरियाणातील निवडणूक प्रक्रियेबाबतही तक्रार केली आहे. आव्हाड, कांदे, ठाकूर यांची मतं बाद करा, अशी आमची मागणी आहे, असं नकवी यांनी सांगितलं.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.