AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणंही मुश्किल होईल”, देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले “नवनीत ताई…”

सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात", अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

...तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणंही मुश्किल होईल, देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले नवनीत ताई...
| Updated on: Aug 04, 2024 | 9:25 AM
Share

Devendra Fadnavis In Amravati : “मला विश्वास आहे की, आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरल्यास यश आपल्यापासून दूर नाही. मग तो अमरावती जिल्हा असो की, वर्धा असो किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र. राज्यातील सर्व जागा महायुती जिंकू शकते, अशा प्रकारची हवा राज्यात आहे. केवळ तुमच्या मनाचा निर्धार आणि जिंकण्याची उर्मी तुमच्यात पाहिजे”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते अमरावतीत बोलत होते.

“विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र, सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तुम्ही गेली 60-70 वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली, यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला शेतमजूर, गरीब का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दलही भाष्य केले. “त्यावेळी खूप मोठ्या मोठा रांगा लागल्या होत्या. अमरावतीत नवनीत ताई, तुम्ही पडल्याचं दु:ख सर्वांना झालं. पण काही लोकांना फार आनंद झाला. राजकमल चौकात त्या सर्वांनी काय केलं, हे आपण सर्वांनी पाहिलं. अरे वेड्यांनो आता जागे झाला नाहीत ना, तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं. हे जर सहन करत राहिलात तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणं मुश्किल होईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आता फक्त मैदानात उतरा”

“आपण जर मैदानात उतरलो तर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काहीजण सत्तेत आले की पैसे कमावतात आणि सत्ता गेली की, यांना गरीब आठवतात. सत्ता गेली की यांचे पोपट बोलायला लागतात. यांना सत्ता फक्त पैशासाठी पाहिजे, आता फक्त मैदानात उतरा”, असे आवाहनही देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले.

“मी पुन्हा एकदा तुमचं सरकार आणून दाखवेन”

“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे आणि पुन्हा एकदा आपण पूर्ण ताकतीने जर का मैदानात उतरलो, तसेच तुमच्या सारखे मावळे जर आमच्या सोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचं सरकार मी आणून दाखवेलच”, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी दिले.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?