AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचं त्यांना फळ मिळालं; अजय कुमार मिश्रांचा घणाघात

सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचं त्यांना फळ मिळालं; अजय कुमार मिश्रांचा घणाघात
| Updated on: Aug 12, 2022 | 12:55 PM
Share

सिंधुदुर्ग : सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळीच कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या (Nitesh Rane) घरी भेट दिली. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका अजय कुमार मिश्रा यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचे फळ त्यांना मिळाल्याचं मिश्रा यांनी म्हटलं आहे. भजापाकडून कधीच सरकारी यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपवर आरोप करत असल्याचे  मिश्रा यांनी यावेळी म्हटले आहे.  तसेच  भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर घणाघात

यावेळी बोलताना अजय कुमार मिश्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचे फळ त्यांना मिळाले. बिहार व महाराष्ट्रमध्ये भाजपाबरोबर राहून ज्यांनी निवडणुका लढवल्या व ज्यांच्या विरोधात त्या लढल्या गेल्या त्याच पक्षांबरोबर त्यांनी आघाडी केली. यामध्ये भाजपाचा दोष नसल्याचे यावेळी मिश्रा यांनी म्हटलं आहे.

‘भाजपा सरकारी यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करत नाही’

पुढे बोतलताना अजय कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे की,  भाजपा सरकारी यंत्रणांच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपावर आरोप करत आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ज्या पक्षांनी भाजपासोबत निवडणूक लढवली पुढे त्यांनीच ज्या पक्षांविरोधात निवडणूक लढवली होती त्यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. यामध्ये भाजपाचा दोष नसल्याचे अजय कुमार मिश्रा यांनी  म्हटले आहे. सोबतच जे.पी. नड्डा जे काही बोलले त्यांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही यावेळी मिश्रा यांनी म्हटलं आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.