AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचं त्यांना फळ मिळालं; अजय कुमार मिश्रांचा घणाघात

सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचं त्यांना फळ मिळालं; अजय कुमार मिश्रांचा घणाघात
| Updated on: Aug 12, 2022 | 12:55 PM
Share

सिंधुदुर्ग : सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) हे सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळीच कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या (Nitesh Rane) घरी भेट दिली. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका अजय कुमार मिश्रा यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खूपसला त्याचे फळ त्यांना मिळाल्याचं मिश्रा यांनी म्हटलं आहे. भजापाकडून कधीच सरकारी यंत्रणांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपवर आरोप करत असल्याचे  मिश्रा यांनी यावेळी म्हटले आहे.  तसेच  भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंवर घणाघात

यावेळी बोलताना अजय कुमार मिश्रा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचे फळ त्यांना मिळाले. बिहार व महाराष्ट्रमध्ये भाजपाबरोबर राहून ज्यांनी निवडणुका लढवल्या व ज्यांच्या विरोधात त्या लढल्या गेल्या त्याच पक्षांबरोबर त्यांनी आघाडी केली. यामध्ये भाजपाचा दोष नसल्याचे यावेळी मिश्रा यांनी म्हटलं आहे.

‘भाजपा सरकारी यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करत नाही’

पुढे बोतलताना अजय कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे की,  भाजपा सरकारी यंत्रणांच्या कामात कधीच हस्तक्षेप करत नाही. ज्यांना या देशाची प्रगती पाहवत नाही, भाजपची लोकप्रियता आवडत नाही तेच लोक भाजपावर आरोप करत आहेत. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये ज्या पक्षांनी भाजपासोबत निवडणूक लढवली पुढे त्यांनीच ज्या पक्षांविरोधात निवडणूक लढवली होती त्यांच्यासोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. यामध्ये भाजपाचा दोष नसल्याचे अजय कुमार मिश्रा यांनी  म्हटले आहे. सोबतच जे.पी. नड्डा जे काही बोलले त्यांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचेही यावेळी मिश्रा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना