AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणाला कुठलं खातं द्यायचं यासाठी वेळ लागतोय, पण येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल- विजयकुमार गावित

Vijaykumar Gavit : मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित यांनी भाष्य केलंय.

कुणाला कुठलं खातं द्यायचं यासाठी वेळ लागतोय, पण येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल- विजयकुमार गावित
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 12, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी भाष्य केलंय. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. “पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता आमदार विजयकुमार गावित यांनी भाष्य केलंय. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

“पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित म्हणालेत.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचं नाव आलं नाही. तर हा केवळ पहिला टप्पा असून त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल पण हे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच असतात असं म्हणत केसरकरांनी दुहेरी भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित खात्यामध्ये काम करण्यास आवडेल असेही कडूंनी सांगितले होते. पण मंत्रिमंडळातच समावेश झाला नसल्यानं ते नाराजी लपून राहिलेली नाही. तर त्यांची मनधरणी आता सर्वच नवनियुक्त मंत्र्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व मंत्र्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होणार हे देखील पहावं लागणार आहे.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना