AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुख्यमंत्र्यांकडे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, पक्षवाढीसाठी मात्र बैठका’, भाजपचा जोरदार टोला

मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

'मुख्यमंत्र्यांकडे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी वेळ नाही, पक्षवाढीसाठी मात्र बैठका', भाजपचा जोरदार टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल भातखळकर
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 08, 2021 | 7:53 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. त्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावलाय. मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय. (Atul Bhatkhalkar’s criticism on CM Uddhav Thackeray and Shiv Sena’s Shiv Sampark campaign)

ओ माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राची चिंता करा. शेतकऱ्यांची चिंता करा. मुंबईतील सर्वसामान्य नागरिकाची चिंता करा. तुम्ही मुख्यमंत्री आहात. युती-आघाड्यांची चिंता करु नका. ते जनता बघेल, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांकडे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वेळ नाही. मात्र, पक्षवाढीसाठी बैठकांवर बैठका घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

कशी असेल शिवसेनेची ‘शिवसंपर्क’ मोहीम?

येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संवाद यात्रा सुरू असतानाच आता शिवसेनेनेही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसन आणि भाजपनेही जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या शिवसंपर्क मोहिमेला अधिक महत्त्व आलं आहे.

जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेअंतर्गत “माझं गाव, करोना मुक्त गाव” करण्यासाठी शाखाप्रमुखांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण झालं की नाही याची माहिती घ्यावी. इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहीती घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जातं.

संबंधित बातम्या :

‘पुणे महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा’, संजय राऊतांचा कार्यकर्त्यांना आदेश

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना कुणासाठी? मुंबई लोकल कधी सुरु? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली