AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा मेगाप्लॅन, महाराष्ट्रात हायटेक रॅलीचं नियोजन, 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणार

लॉकडाऊनमधून हळूहळू शिथीलता मिळत असताना आता भाजपने मेगाप्लॅन तयार केला आहे. (BJP to hold virtual rallies). भाजपने हायटेर रॅलीचं नियोजन केलं आहे.

भाजपचा मेगाप्लॅन, महाराष्ट्रात हायटेक रॅलीचं नियोजन, 25 लाख लोकांपर्यंत पोहोचणार
| Updated on: Jun 01, 2020 | 11:15 AM
Share

नागपूर : लॉकडाऊनमधून हळूहळू शिथीलता मिळत असताना आता भाजपने मेगाप्लॅन तयार केला आहे. (BJP to hold virtual rallies) भाजप आता राज्यभर लवकरच हायटेक रॅली सुरु करणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. या प्लॅननुसार, भाजप राज्यातील पाच लाख कुटुंब आणि 25 लाख लोकांपर्यंत पोहोचून, केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या मदतीची माहिती देणार आहे.

तब्बल 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं भाजपचं नियोजन आहे. केंद्रातील पॅकेजमधून काय मिळालं आणि काय हवं याबाबत भाजप व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. (BJP to hold virtual rallies)

केंद्रातील आणि राज्यातील नेते या व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सहा विभागात ही व्हर्च्युअल रॅली घेण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात लवकरच या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्हर्च्युअल रॅलीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपचं राज्य सरकारवर टीकास्त्र 

दरम्यान, भाजपने राज्यातील कोरोना संसर्गावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत, मात्र योग्य वैद्यकीय सुविधा लोकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. “देशात एकूण उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी 41 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय कोरोनामुळे देशात होणाऱ्या मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. रोज ही संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत केवळ आकड्यांची फेकाफेकी महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला होता.

वाचा : सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस

राणेंची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी

दुसरीकडे भाजप खासदार नारायण राणे, सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, महाराष्ट्रातील रुग्णालये लष्कराच्या ताब्यात देऊन, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली होती. मात्र ही राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचं स्पष्टीकरण भाजपने दिलं होतं.

(BJP to hold virtual rallies)

संबंधित बातम्या  

सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपती राजवट लावा म्हणणारे, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या ‘आपल्या’ माणसांनी आकडे पाहावे : मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.