AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरचा विकासनिधी कमी करु नका, बावनकुळे मुख्यमंत्र्यांना भेटणार

जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीला कमी करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तो निधी कमी करु नये. नाहीतर याचा नागपूरच्या विकासावर मोठा परिणाम होईल, अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्य सरकारला केली.

नागपूरचा विकासनिधी कमी करु नका, बावनकुळे मुख्यमंत्र्यांना भेटणार
| Updated on: Jan 31, 2020 | 3:00 PM
Share

नागपूर : जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या निधीला कमी करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत, तो निधी कमी करु नये. नाहीतर याचा नागपूरच्या विकासावर मोठा परिणाम होईल (Nagpur Funds), अशी मागणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्य सरकारला केली (Chandrakant Bawankule).

“नागपूरच्या विकासासाठी 776 कोटी निधी दिला जातो. तो कमी करण्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नागपुरातील तीनही मंत्र्यांना माझी विनंती आहे की, हा निधी 776 कोटी वरुन 850 कोटी केला पाहिजे. नागपूर ही उपराजधानी आहे, त्याचं विशेष महत्त्व आहे. नागपूरला अधिवेशन होतं, मोठ्या प्रमाणावर नागपूरवर भार असतो. नागपूरच्या सर्व विकासयोजना ज्या डीपीसीकडे चालतात, त्या निधी अभावी कमी होतील. त्यामुळे हा निधा 850 कोटी करावा”, अशी मागणी चंद्रकांत बावनकुळे यांनी केली.

“याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही निदर्शनं करणार आहोत. याप्रकरणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि याबाबत त्यांना विनंती करणार आहे”, असंही बावनकुळे म्हणाले.

तसेच, राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यावर अन्याय करुन नागपूरला फायदा केला नाही, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी केलेला आरोप चंद्रकांत बावनकुळे यांनी फेटाळून लावला.

संरपंच निवडीबाबत फडणवीस सरकारचा निर्णय योग्य होता : बावनकुळे

“सरकारने ग्रामपंचायत सरपंच निवड सदस्यातून करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. यात ग्रामीण जनतेचा विचार घेतला पाहिजे. फडणवीस सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. म्हणून हा निर्णय घेण्यात आला असेल, तर असं करु नका. यात जनतेचं नुकसान होईल. अनेक ग्रामपंचायत जुन्या निर्णयावर आनंदी आहे. त्याचा विचार करावा. घाईघाईत निर्णय न घेता ग्रामपंचायतींचं मत मागवावं नंतर निर्णय घ्यावा”, अशीही मागणी बावनकुळे यांनी केली.

Follow Us
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...