AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मशाल सध्या पंजाच्या हाती, तेल कोण टाकतंय? ठाकरे यांना जिव्हारी लागणारा बाण कुणाचा?

वरळी मतदार संघाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, ठाकरेंनी वरळीत काहीच कार्यक्रम घेतले नाहीत. आदित्य ठाकरेंनी कार्यक्रम घेतले तरी त्याला किती लोक येतील, याचीही त्यांना भिती आहे.

मशाल सध्या पंजाच्या हाती, तेल कोण टाकतंय? ठाकरे यांना जिव्हारी लागणारा बाण कुणाचा?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 15, 2022 | 1:45 PM
Share

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची मशाल पंजाच्या हाती दिलीय. त्या हातात घड्याळ आहे आणि त्यात तेल शरद पवार (Sharad Pawar) टाकतायत. त्यामुळे ती मशाल कुठपर्यंत चालेल, हे सांगता येत नाही, अशी जिव्हारी लागणारी टीका भाजप नेत्याने केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळीवर भाजपने अधिक लक्ष केंद्रीत केलंय. या अनुशंगाने चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. ते म्हणाले, ‘ मशाल त्यांनी कुणाच्या हातात दिलीय? पंजाच्या हातात. हाताला घडी आहे. त्यात तेल शरद पवार टाकतात. त्यामुळे ती मशाल किती टिकतेय, हे सांगता येत नाही.

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गेलेली मशाल आहे. त्यामुळे मला वाटतं, ज्या पद्धतीने त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात स्वीकारलाय. घड्याळ स्वीकारलाय. वरळीतील जनता ही 51 टक्के मतं भाजपाला देईल….

वरळीत भाजपाचा उमेदवार कोण असेल, लवकरच आमचा संसदीय बोर्ड जाहीर करेल,असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

वरळी मतदार संघाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, ठाकरेंनी वरळीत काहीच कार्यक्रम घेतले नाहीत. आदित्य ठाकरेंनी कार्यक्रम घेतले तरी त्याला किती लोक येतील, याचीही त्यांना भिती आहे. अजूनही ते भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत, सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसतात. त्यामुळे ते वरळीत कार्यक्रम घेण्याची हिंमत करत नाहीत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.

लोकसभा निवडणुकांसाठी बारामती मतदार संघावर तर विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघावर भाजप विशेष मेहनत घेत आहेत. आतापासूनच भाजपने येथे बड्या नेत्यांचे दौरे आयोजित केले आहेत.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.