AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये लवकरच बदल होणार, पण केव्हा?; नाना पटोले यांनी सांगितलं

भाजपची परिस्थिती खूप अडचणीची आली आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या यात्रेला गेलो होतो. उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या प्रचाराचा नारळ फोडायला तिथं सभा लावली होती, असा आरोप पटोले यांनी केला.

काँग्रेसमध्ये लवकरच बदल होणार, पण केव्हा?; नाना पटोले यांनी सांगितलं
नाना पटोलेImage Credit source: Google
| Updated on: Feb 10, 2023 | 3:40 PM
Share

मुंबई : बाळासाहेब थोरात आणि काँग्नेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद झाला. या वादावर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले. रायपूर येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. त्यानंतर पक्षात काही बदल केले जातील. बच्चू कडू यांनी काँग्रेसचे (Congress) १५ आमदार फुटणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, कुणाच्या व वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पदयात्रा येत होती. तेव्हाही काही हौसीगौसींनी त्याठिकाणचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर चर्चा करण्याचं काही कारण नाही.

पंतप्रधान मुंबईत, महाराष्ट्रात येतात ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाणीव त्यांना मागच्या वेळी आले तेव्हा करून दिली होती. आता प्रश्न पुन्हा वाढले. राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न विचारले. अदानी बरोबर त्यांचे संबंध होते. किती कंत्राट त्यांना दिले. किती वेळा ते पंतप्रधानांच्या दौऱ्यात होते. यावर त्यांनी उत्तर दिलं नाही. हे उत्तर त्यांना देणं भाग आहे, असंही पटोले यांनी म्हंटलं.

पंतप्रधानांनी याची उत्तरं दिले पाहिजे

पंतप्रधानांबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, लोकसभेत ते बोलत नाहीत. पण, बाहेर ते मन की बात बोलतात. जनतेच्या मनातलं त्यांना ओळखता येते असं ते म्हणतात. १४० कोटी लोकं माझ्यासोबत आहेत. असंही ते म्हणतात. या देशातला प्रत्येक माणूस ज्यांनी एलआयसीत पैसे भरले आहेत. बँकांमध्ये पैसे भरले आहेत. हे सगळं संभ्रमात आणि भयभित आहेत. त्याची उत्तरं पंतप्रधान मोदी यांनी दिली पाहिजे.

पंतप्रधान मोदी हे लोकसभेत बोलले नाहीत. राहुल गांधी यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत. मुंबईत आज या प्रश्नांची उत्तर द्यावीत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडविणार याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी विनंती नाना पटोले यांनी केली.

फेरीवाल्यांना भाजपने फसविल्याचा आरोप

भाजपची परिस्थिती खूप अडचणीची आली आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या यात्रेला गेलो होतो. उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या प्रचाराचा नारळ फोडायला तिथं सभा लावली होती, असं पटोले यांनी म्हंटलं.

मुंबईत मागच्या वेळा नरेंद्र मोदी येथे आले. तेव्हा लोकं कसं जमवायचे असा प्रश्न होता. पूर्ण शहरातल्या फेरीवाल्यांना कर्ज देण्याचं आश्वासन दिलं. पण, काही लोकं मला भेटायला आले होते. ते म्हणाले आम्हाला भाजपनं फसविलं, असंही नाना पटोले यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भाजपनं जनतेला फसविलं आहे. मुंबईतील जनता भाजपला मदत करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.